Maharashtra Farmer Debt Relief Update: राज्य सरकारने कर्जमाफीचा मोठा गाजावाजा केला असला, तरी लाखो शेतकऱ्यांना विविध अटी-शर्तींच्या जाळ्यात अडकवून प्रत्यक्ष लाभापासून वंचित ठेवले आहे, असाआरोप विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला..माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, की कर्जमाफीचा आधार घेत आता शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला जात आहे..Loan Waiver Scheme: कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण.एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने काढून घेण्याचे सरकारचे धोरण असून, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. शेतकऱ्यांसाठी निधी नसल्याचे सरकार सांगते; मात्र योजनांच्या प्रसिद्धीसाठी १० कोटी रुपये खर्च केले जातात..Namo Shetkari Yojana: कर्जमाफीचे कारण देत 'नमो शेतकरी महासन्मान निधी'ला कात्री? वडेट्टीवारांचा गंभीर आरोप.ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेचा प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबतही सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला..ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, वसतिगृहे आणि इतर सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी ३ऑगस्टपासून पूर्व विदर्भात ‘मंडल यात्रा’ काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.