cashew nut
cashew nut  
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवर काजू लागवड

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात १ हजार ५०० हेक्टरवर काजू लागवड करण्यात आली असून अजुनही काजू लागवडीचे काम सुरू आहे. `मनरेगा` अंतर्गत २ हजार १०० हेक्टर काजू लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाला देण्यात आले आहे. सिंधुदुर्गात काजू लागवडीला पोषक वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून काजू पिकांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी पाहत आहे. पारंपरिक काजू झाडे लागवडीपेक्षा तिसऱ्या ते चौथ्या वर्षी उत्पन्न देणाऱ्या वेंगुर्ला १ ते ९ या जातीच्या रोपांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात काजू लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टरवर पोहोचले असून अजुनही शेतकऱ्यांचा कल काजू लागवडीवर दिसून येत आहे. परंतु शासनाने १०० टक्के अनुदानावर असणारी फळबाग लागवड योजना बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना आता फक्त `मनरेगा` योजनेंतर्गतच काजू रोपे लागवड करता येत आहे. यावर्षी शासनाकडून जिल्ह्याला २ हजार १०० हेक्टर क्षेत्र लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी रोपवाटिकांमधून काजू रोपे उपलब्ध होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जून पासून काजू रोपे लागवडीला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत `मनरेगा` अंतर्गत १ हजार ५०० हेक्टरवर काजू रोपे लागवड करण्यात आली आहेत. शेतकरी वेंगुर्ला ४, वेंगुर्ला-७ आणि नव्याने विकसीत केलेले वेंगुर्ला-९ जातीची काजू रोपे लागवड करीत आहेत. स्वखर्चानेही लागवड शासकीय योजनेव्यतिरिक्त जिल्ह्यात स्वखर्चाने देखील काजू लागवड केली जात आहे. हे क्षेत्र सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक आहे. याशिवाय काही सामाजिक संस्थांकडून देखील १५ ते २० हजार काजू रोपे लागवडीकरिता देण्यात आली आहेत. त्यामुळे काजू लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. काजू लागवड साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. त्यामुळे काजू लागवड क्षेत्राचा अंतिम आकडा ऑगस्ट अखेरपर्यंत प्राप्त होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT