काजू पीक
काजू पीक  
मुख्य बातम्या

काजू शेती आतबट्ट्याची

Raj Chougule

रत्नागिरी : काजूला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने यंदा काजू उत्पादक अडचणीत आला आहे. गेल्या दोन वर्षांत काजूचा उत्पादन खर्च किलोला २५ रुपये वाढून १२२.९१ रुपयांपर्यंत गेला; मात्र काजूला सध्या १०० ते ११० रुपये म्हणजेच उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत आहे. 

महाराष्ट्रात १ लाख ८६ हजार हेक्टर जमीन काजू लागवडीखाली आहे. त्यातील ७५ टक्के क्षेत्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत आहे. जवळपास ४ ते ५ लाख शेतकऱ्यांचे काजू बीच्या पडलेल्या दरामुळे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.  शेतकऱ्यांना सध्या काजूचा भाव किलोला १०० ते ११० रुपये एवढाच व्यापारी देत आहेत. काजूचा उत्पादन खर्च प्रत्येक किलोला २०१६-१७ मध्ये ९७.५७ रुपये, तर २०१७-१८ मध्ये १२२.९१ रुपये इतका येत आहे. दापोलीच्या बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य जयप्रकाश नारकर यांनी माहितीच्या अधिकारात उत्पादन खर्चाची आकडेवारी मागितली होती. यामध्ये विद्यापीठाने उत्पादन खर्च वाढल्याचे मान्य केले आहे. किमान २०० रुपये किलो इतका दर मिळाल्यावरच काजू उत्पादक नुकसानीतून बाहेर येण्याची शक्यता आहे, अन्यथा काजू उत्पादक तोट्याच्या खाईत जाण्याची भीती आहे. दर घसरण्याची कारणे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने २०१८-१९ चे अंदाजपत्रक फेब्रुवारीमध्ये सादर केले. त्या वेळी काजूचा आयात कर ५ टक्क्यांवरून वाढवून ७.५ टक्के करावा, अशी मागणी होती परंतु; सरकारने काजू कारखानदारांच्या प्रेमापोटी बजेटमध्ये आयात कर ५ टक्क्यांवरून निम्मा कमी करून २.५ टक्के केल्याने काजूची आयात वाढली. यामुळे स्थानिक काजू उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली. स्थानिक ठिकाणी मागणी कमी आणि दरही उतरल्याने कोकणासह अन्य काजूच्या बाजारपेठांमध्ये सध्या मंदीचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT