drip irrigation
drip irrigation  
मुख्य बातम्या

सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर पुन्हा लाभ

टीम अॅग्रोवन

अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता सात वर्षानंतर पुन्हा लाभ मिळू शकणार आहे. राज्य सरकारने पूर्वीच्या धोरणात बदल करीत १० वर्षांची मर्यादा आता सात वर्षांवर आणली आहे. याचा फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेऊ शकतील. सन २०१४-१५ पर्यंत सूक्ष्म सिंचन योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत राबविण्यात येत होती. सन २०१५-१६ पासून सूक्ष्म सिंचन योजना पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या ‘प्रतिथेंब अधिक पीक’ घटकाअंतर्गत राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी लाभ घेतलेल्या क्षेत्रावर १० वर्षानंतर पुन्हा लाभ अनुज्ञेय होता. परंतु, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या ‘प्रतिथेंब अधिक पीक’ घटकाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सात वर्षांच्या कालावधीनंतर अनुदानाचा लाभ अनुज्ञेय केला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठीही सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच क्षेत्रावर पुन्हा लाभ देण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने आता सुधारणा करून सात वर्षानंतर शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा सध्या दुष्काळी परिस्थिती, पाण्याची कमतरता अशी परिस्थिती सर्वत्र आहे. या काळात पाण्याचा काटेकोर वापर करण्याच्या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर जोर दिला जात आहे. शेतकरीसुद्धा विविध योजनांमधून सूक्ष्म सिंचन संच खरेदी करतात. बऱ्याच शेतकऱ्यांकडील संच पाच ते सात वर्षात विनाकामाचे होतात. अशा शेतकऱ्यांना या नव्या धोरणामुळे सातव्या वर्षी पुन्हा नवीन संच खरेदीसाठी अनुदानाचे पाठबळ फायदेशीर ठरणार आहे. याबाबत शासनाकडून सोमवारी (ता.२४) संबंधितांना आदेश करणारे परिपत्रक काढण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT