थंडीची चाहूल व वातावरणातील इतर बदलांमुळे केळीवर करपा आला असून, झाडांची पाने पिवळी पडून अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया मंदावली आहे.
थंडीची चाहूल व वातावरणातील इतर बदलांमुळे केळीवर करपा आला असून, झाडांची पाने पिवळी पडून अन्नद्रव्य घेण्याची प्रक्रिया मंदावली आहे. 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात थंडीचा केळी पिकाला फटका

टीम अॅग्रोवन

जळगाव ः मागील काही दिवसांपासून तापमानात घसरण होत असून, स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरणही नाही. यामुळे केळीची उगवण शक्ती, निसवणी, वाढ यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. जिल्हाभरातील नव्या लागवडीच्या कांदेबागांमध्ये अधिकचा परिणाम दिसत आहे. याचवेळी टिश्‍यू रोपे आर्द्रतायुक्त वातावरण आणि थंडी यामुळे करपा रोगाला बळी पडले आहेत. रोपांची वाढ खुंटली आहे; तर मागील २० ते २२ दिवसांमध्ये लागवड केलेल्या केळीच्या कंदांचे अंकुरण हवे तसे होत नसल्याचे चित्र आहे.  केळीला स्वच्छ सूर्यप्रकाशित व किमान १८ ते १९ पेक्षा अधिक तापमान हवे असते. जळगाव, नंदुरबार भागात मागील आठ ते १० दिवसांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअसखाली आले आहे. त्यातच मध्येच ढगाळ वातावरण असते. या वातावरणातील बदलाचा परिणाम केळीला बाध्य करीत असल्याचे तज्ज्ञ व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कंद लागवड करून १८ ते २० दिवस झाले; पण ते अंकुरले नाहीत. त्यात रात्रीच्या वेळी पाण्याची पाळी देण्याचा खटाटोप शेतकरी करीत आहेत. खतेही टाकत आहेत; पण तरीही हवा तसा परिणाम कंदांबाबत दिसत नाही. यातच पाणी व गारवा यामुळे कंद कुजतील आणि नव्याने कंद लागवड करावी लागेल. अनेक ठिकाणी नांग्या भराव्या लागतील, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  शेतकरी खते, फवारण्यांनी त्रस्त एकीकडे केळीला हवे तसे दर नाहीत. त्यातच आता करपा रोग फोफावू लागल्याने केळीला हवी ती अन्नद्रव्ये मिळून वाढ व्हावी, करपा रोखला जावा यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत. शेतकरी विद्राव्य खतांचा वापर करीत आहेत. त्यात अधिकचा खर्च येत असून, उत्पादन खर्च वाढत आहे.  रोपे, कंदांना फटका रात्रीच्या गारव्याचा फटका कंद व दोन अडीच महिन्यांच्या टिश्‍यू केळी रोपांना अधिक बसत आहे. रोपे पिवळसर पडत आहेत. रावेर, यावल, जळगाव, चोपडा, भडगाव, जामनेर, असा सर्वत्र हा परिणाम दिसत आहे़, तर नंदुरबारात तळोदा, शहादा भागातही ही समस्या आहे. जळगाव जिल्ह्यात जवळपास ११ हजार हेक्‍टरवरील लहान केळीची टिश्‍यू रोपे व नऊ हजार हेक्‍टरवरील कंदांना या प्रतिकूल वातावरणाचा फटका बसल्याची माहिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातही जवळपास अडीच हजार हेक्‍टरवरील केळीला प्रतिकूल वातावरणाची बाधा पोचली आहे.   निसवणीच्या बागांनाही फटका सध्या रावेर, यावल, जळगाव, चोपडा आदी भागात काही केळी बागांमध्ये निसवणीची प्रक्रियाही सुरू आहे. पण घड पहिल्या पानातच अडकू लागले आहेत. तर फण्या, केळीच्या आकारावरही परिणाम दिसू लागला आहे. हव्या त्या लांबीचे घड नसल्याने सहा ते सातच फण्या ठेवण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. अर्थातच यामुळे उत्पादनात १८ ते २१ टक्के घट शक्‍य आहे. प्रतिक्रिया थंडी वाढू लागल्याने कंद आणि केळी रोपांवर परिणाम दिसत आहे. पुढील काळात निसवणीच्या बागांमध्ये घडही अडकतील. शेंडे पिवळे पडतील. अशात पाण्याची पाळी रात्री देणे, बागांभोवती वारा अवरोधक तयार करणे व सायंकाळी बागेत शेकोट्या पेटविणे असे प्राथमिक उपाय करता येतील.  - प्रा. नाझेमोद्दीन शेख, प्रमुख, केळी संशोधन केंद्र, जळगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT