पुणे : कृत्रिम पावसाची देशातील पहिल्या प्रयोगाची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रयोगात वापरण्यात येणारी सर्व उपकरणे योग्य पद्धतीने काम करत असल्याचे या चाचणीतून स्पष्ट झाले, त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाल्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. आता याचा वापर करून सोलापूर व तुळजापूर परिसरात लवकरच प्रयोग करण्यात येणार आहे. नैॡत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रदेशातील कृत्रिम पावसाचा भारतातील पहिल्या शास्त्रशुद्ध प्रयोगात पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थे’मधील (आयआयटीएम) शास्त्रज्ञ यात सहभागी झाले आहेत. यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटकात सरकारने असे प्रयत्न केले होते. मात्र आज केलेली चाचणी ही ‘आयआयटीएम’ने केलेली देशातील पहिली शास्त्रीय चाचणी होती.
पथदर्शी प्रकल्प कृत्रिम पाऊस कुठे व कधी पाडता येऊ शकतो, याची मार्गदर्शत तत्त्वे तयार करणे हा या प्रयोगाचा उद्देश आहे. पाऊस मोजण्यासाठी सोलापूर परिसरात १२० उपकरणे बसविली आहेत, अशी माहिती ‘आयआयटीएम’चे संचालक डॉ. प्रा. रवी एस. नन्जुनदैया यांनी दिली.
आज काय झाले? पाऊस पाडण्यासाठी विमाने बारामतीत दाखल झाली आहेत. त्यांना उपकरणे लावून मंगळवारी या विमानांनी उड्डाण केले. ही सर्व उपकरणे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला हिरवा कंदील मिळाला. औरंगाबाद येथून ही विमाने उड्डाण करून सोलापूर आणि तुळजापूर येथील ढगांमध्ये रसायने फवारणार आहेत. या प्रयोगातून भविष्यात कोणत्या स्थितीत कृत्रिम पाऊस पाडता येईल, याची शास्त्रीय माहिती पुढे येईल. - डॉ. प्रा. रवी एस. नन्जुनदैया, संचालक, ‘आयआयटीएम’ असा पाडणार पाऊस
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.