औरंगाबाद : तेलंगण पॅटर्न राज्यात राबविण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना कर्जमुक्त करीत सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी येत्या फेब्रुवारीपासून राज्यात जनजागृती यात्रा काढण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी बुधवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिला.
श्री. सूर्यवंशी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असून, मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्नांसंबंधी निर्णय घेण्यात यावेत, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्याकडे मागण्या सादर करणार आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले. तसे न करता दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याचा जो निर्णय घेतला तो शेतकऱ्यांना मान्य नाही. सर्वच पक्ष निवडणुकीत आश्वासन देतात व नंतर मात्र पूर्ण करीत नाहीत. यामुळे लोकशाहीवरील लोकांची श्रद्धा कमी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त ठेवायचे असेल तर तेलंगणच्या धर्तीवर राज्य सरकारने योजना राबविल्यास शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीसाठी कोणाच्या दारात उभे राहण्याची गरज भासणार नाही.’’ या पत्रकार परिषदेला विजय काकडे पाटील यांची उपस्थिती होती.
‘ओटीएस’मधून सातबारा कोरा करण्याची संधी शेतकऱ्यांच्या सातबारावरील संपूर्ण बोजा कमी करण्यात यावा. सरकारला ते शक्य नसेल तर किमान सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपये देण्यात यावेत. त्यावरील रक्कम रिझर्व्ह बॅंकेच्या सहकार्याने ओटीएसच्या माध्यमातून सातबारा कोरा करण्याची संधी सरकारने घ्यावी, असेही जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले. रिझर्व्ह बॅंकेने देशातील तेवीस मोठ्या उद्योगांचे दहा लाख कोटी रुपये ओटीएसमध्ये माफ केले आहेत. जर उद्योगांना मोठी कर्जमाफी मिळू शकते, तर शेतकऱ्यांना का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अशा आहेत मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.