संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

विभक्त कुटुंबांसाठी मनरेगातून शौचालये ः बबनराव लोणीकर

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील ग्रामीण ३४ पैकी ३२ जिल्हे हागणदारीमुक्त झाले असून, उर्वरित दोन जिल्हे येत्या आठवडाभरात हागणदारीमुक्त होऊन राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली जाईल. आधारभूत (बेसलाइन) सर्वेक्षणानुसार हे सर्व जिल्हे हागणदारीमुक्त होत असले तरी बेसलाइन सर्वेक्षणानंतर विभक्त झालेल्या कुटुंबांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शौचालये बांधण्याच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे दिले.

या वेळी हागणदारीमुक्त झालेल्या नाशिक, बुलडाणा, परभणी, नंदुरबार, यवतमाळ, अहमदनगर व धुळे या सात जिल्ह्यांचा सत्कार सोहळा श्री. लोणीकर यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे-पाटील, नाशिक जि.प. अध्यक्ष शीतल सांगळे, बुलढाडाणा जि.प. अध्यक्ष उमाताई तायडे, नंदुरबार जि.प. अध्यक्ष रजनी नाईक, परभणीचे जि.प.चे पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सभापती अशोक काकडे आदी उपस्थित होते.

स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करून श्री. लोणीकर यांनी, हे यश लोकप्रतिनिधी, सर्व सरपंच तसेच राज्यस्तरापासून ते गावपातळीपर्यंतचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी राबविण्यात आलेल्या निर्मल ग्राम मोहिमेत एकदा गाव निर्मल घोषित झाल्यानंतर स्वच्छतेबाबत त्या ठिकाणी सातत्य राहत नव्हते.

स्वच्छतेच्या कामात  महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांनी महान कार्य केले आहे. त्याचा आदर्श ठेवून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छतेसाठी लोकसहभागातून चळवळ राबविण्याचा निर्णय घेतल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

श्री. लोणीकर पुढे म्हणाले, की प्रारंभी स्वच्छ भारत अभियानमध्ये सर्व ग्रामीण व शहरी भागात हागणदारीमुक्तीसाठी शौचालयनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले. संपूर्ण देश २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत देश हागणदारीमुक्त करण्याचे उद्द‍िष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुदतीच्या दीड वर्षे आधीच आपले राज्य हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार केला. येत्या दोन-तीन दिवसांत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होत असल्याचे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT