संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कर्जमाफी योजनेला १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : राज्यात कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वन टाइम सेटलमेंटसाठीसुद्धा ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याचा आदेश शासनाने शनिवारी (ता. ३१) सायंकाळी काढला. हा आदेश काढल्यानंतर तातडीने याबाबतची माहिती राज्यातील जिल्हा बॅंकांना कळविण्यात आली आहे.

सायंकाळी उशिरा आदेश निघाल्याने अद्याप सेवा सोसायट्यांपर्यंत हे आदेश आले नसले तरी सोमवारी (ता. १) त्यांना याबाबत अधिकृत माहिती कळविली जाईल, असे जिल्हा बॅंकांच्या सूत्रांनी सांगितले. २८ जूनला ही योजना जाहीर झाल्यानंतर टप्प्याने यासाठी मुदत वाढविली आहे.

या योजनेत ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत वाढविलेली होती. एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट) साठीही हाच कालावधी होता. परंतु सध्या खरिपाच्या तयारीत शेतकरी असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाने दोन्ही योजनांच्या तारखा वाढविल्या. यापैकी वन टाईम सेटलमेंटसाठी तीन महिन्यांच्या कालावधीत वाढ करताना शासनाने ही मुदत ३० जून २०१८ पर्यंत वाढविली आहे.

काही कारणाने अद्यापही या योजनेत सहभागी नसलेले शेतकरीही यात सहभागी व्हावेत हा या मागचा उद्देश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मार्च एडिंगच्या गडबडीत असलेल्या जिल्हा बॅंकांना सायंकाळी उशिरा याबाबतचा आदेश प्राप्त झाला. याची अंमलबजावणी आता सोमवारपासून सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्जमाफीच्या योजनेत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मुदत वाढविल्याचा शासन आदेश शनिवारी (ता. ३१) सायंकाळी प्राप्त झाला आहे. यानुसार आता पुढील कार्यवाही होईल. - सुधीर काटे, सहायक व्यस्थापक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT