ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम 
मुख्य बातम्या

राज्यात ८१ कारखान्यांची धुराडी पेटली

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात यंदा भरपूर ऊस असल्यामुळे १४० साखर कारखान्यांमध्ये गाळपाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्याच टप्प्यात ८१ कारखान्यांची धुराडी पेटली असून, आतापर्यंत आठ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.  राज्यातील शेतकऱ्यांचे ऊस वेळेत गाळपाला घेण्यासाठी नगरसहित सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने आघाडीवर आहेत. कोल्हापूर भागात डी. वाय. पाटील कारखान्याने २१ हजार टन तर ‘गडहिंग्लज’ने १४ हजार आणि छत्रपती राजाराम कारखान्याने १२ हजार टन गाळप केले आहे. सांगली भागात दहा कारखाने सुरू झाले असून ‘हुतात्मा अहिर’मधून २७ हजार टन तर ‘श्री श्री शुगर’ने २० हजार टनांचे गाळप केले. पुणे भागात ३४ हजार टन ऊस गाळून ‘विघ्नहर’ने आघाडी घेतली आहे. ‘सोमेश्वर’ने २५ हजार, ‘संत तुकाराम’मध्ये १५ हजार, ‘भीमाशंकर’मध्ये २१ हजार, तर ‘नीरा-भीमा’ने २३ हजार टन गाळप केले आहे.  सोलापूर भागात आघाडीच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ७० हजार टन ऊस गाळला आहे. नगरच्या साखर उद्योगातील भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने ३६ हजार टन, तर ‘कोपरगाव’ने १४ हजार, ‘अशोक’ने पाच हजार, ‘गंगामाई’ने ३२ हजार, तर ‘संजीवनी’ने आतापर्यंत १४ हजार टन गाळप केले आहे.  राज्यात गाळप परवाने घेण्यासाठी १९१ कारखान्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील ८१ कारखान्यांमधून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावणेआठ लाख टन गाळप झाले आहे. सव्वातीन लाख क्विंटल ताजी साखर तयार झाल्याचे सांगितले जात आहे. अर्थात, प्रत्येक कारखान्यात किती साखर तयार झाली याची माहिती अजून तयार झालेली नाही. राज्यात अजून २६ कारखान्यांना लवकरच परवाना मिळणार आहे. मात्र या कारखान्यांनी सरकारची देणी दिलेली नाहीत. चार कारखान्यांनी अर्धवट माहिती पाठविल्यामुळे त्यांनाही गाळप परवाना मिळालेला नाही. शेतकऱ्यांची एफआरपी थकविणाऱ्या २१ साखर कारखान्यांना परवाना न देण्याचा निर्णय राज्य शासनाने तूर्त कायम ठेवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT