जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून ७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून ७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग 
मुख्य बातम्या

हतनूर धरणातून ७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

टीम अॅग्रोवन

जळगाव  : तापी नदीवरील मुक्ताईनगर व भुसावळनजीकच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणात मध्य प्रदेशातून पाण्याचा प्रवाह कायम असून, १० दरवाजे उघडे करण्यात आले आहेत. या धरणातून ७८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

या धरणाचे सुवातीला दोन दरवाजे मागील आठवड्यात उघडण्यात आले होते. सोमवारी (ता. २५) सहा दरवाजे उघडले, तर मंगळवारी (ता. २६) पुन्हा दोन दरवाजे उघडे करण्यात आले. धरणाच्या सांडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हतनूर धरणाच्या क्षेत्रात सुमारे ५ मिलिमीटर पाऊस मंगळवारी झाला आहे.

मंगळवारी दुपारी मुक्ताईनगरसह जळगाव, पाचोरा, धरणगाव, चाळीसगाव, पारोळा, चोपडा, जामनेर, यावल, रावेर, जामनेर, भडगाव, अमळनेर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यात जळगावात बुधवारी सकाळी आठपर्यंत २२, धरणगावात १६, चोपड्यात आठ, यावलमध्ये १२,  मुक्ताईनगरात सहा, पाचोरा येथे १२, चाळीसगावात २२ , भडगावात १४, पारोळा येथे आठ, बोदवड येथे १४ आणि रावेरात आठ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती मिळाली.

चाळीसगाव तालुक्‍यात चांगला पाऊस झाला असूून, मागील तीन दिवस सलग पाऊस झाला आहे. याचा लाभ खरीप पिकांना होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासंबंधीची कामे झालेल्या पारोळा, पाचोरा, चाळीसगाव भागात चांगला जलसंचय झाला आहे. या भागातील लहान मोठे असे सुमारे सात साठवण बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रावेरात मात्र हवा तसा पाऊस या आठवड्यात झालेला नाही. मागील आठवड्यात फक्त पाल, पाडले भागात पाऊस झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT