सांगली जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रतीक्षेत ४० हजार शेतकरी
सांगली जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रतीक्षेत ४० हजार शेतकरी  
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात कर्जमाफीच्या प्रतीक्षेत ४० हजार शेतकरी

टीम अॅग्रोवन

सांगली : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेस पात्र असतानाही दोन वर्षांत अद्याप लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४० हजारांच्या घरात आहे. त्यांच्या कर्जाची रक्कम ३५ कोटी रुपये आहे. त्यापैकी सुमारे २५ हजार शेतकरी जिल्हा बॅंकेचे कर्जदार आहेत. वंचित शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली. 

शासनाने जून २०१७ मध्ये ही कर्जमाफी योजना जाहीर केली. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीत असणाऱ्या कर्जासाठी योजना लागू केली. शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे थकीत कर्ज पूर्ण माफ करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या १५ याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तरीही सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील ४० हजार शेतकरी अद्यापही वंचित आहेत. त्यापैकी जिल्हा बॅंकेचे खातेदार २५ हजारांच्या घरात आहेत. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची घोषणा केल्याने या शेतकऱ्यांना आशा वाटू लागली आहे. जिल्ह्यातील दीड लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या २९ हजार ९ शेतकऱ्यांचे ११८ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. दीड लाखापेक्षा अधिक रक्कम थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजना लागू करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील ३,४५५ शेतकऱ्यांना ३२ कोटी ३३ लाख रुपयांचा लाभ मिळाला. 

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही २५ हजार रुपयांप्रमाणे प्रोत्साहन अनुदान दिले. त्यामध्ये जिल्ह्यातील ८७ हजार ३०१ शेतकऱ्यांना १३४ कोटी ३८ लाख रुपयांचा लाभ मिळाला. शासनाच्या कर्जमाफी योजनेतून आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ७६५ शेतकऱ्यांना २७४ कोटी ८२ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT