जस्तगावातील सोयाबीनचा विमा मंजूर करा
जस्तगावातील सोयाबीनचा विमा मंजूर करा 
मुख्य बातम्या

जस्तगावातील सोयाबीनचा विमा मंजूर करा

टीम अॅग्रोवन

तेल्हारा, जि. अकोला :  तालुक्यातील जस्तगाव परिसरात सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर कीड आहे. सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याने त्यावर शेंगा धरलेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जस्तगाव येथील शेतकऱ्यांनी केली. 

याबाबत तेल्हारा गटविकास अधिकारी भारत चव्हाण यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, शेतकऱ्यांनी कर्ज ‌व सोने गव्हाण ठेवून सोयाबीनची पेरणी केली. ‌पिकाचा विमा सुध्दा काढला आहे.

सततच्या ‌पावसामुळे अतोनात ‌नुकसान झाले. ऐन वेळेवर‌‌ बहारावरच पाण्याने मुसंडी मारली. त्यामुळे‌‌ झाडांना शेंगाच लागल्या नाहीत. या भागात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. शासनाने तातडीने पीक विमा मंजुर ‌करावा, अशी मागणी डॉ. किशोर जवंजाळ, निलेश जवंजाळ, गोपाल जवंजाळ, गजानन पुंडे, रवी जवंजाळ, गोपाल कवळे, नितीन गावंडे व लोकजागर मंचाचे तालुकाअध्यक्ष अमोल जवंजाळ यांच्यासह इतर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

Painganga Project : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

SCROLL FOR NEXT