रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजूसाठी २२ कोटींचा फळपीकविमा
रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजूसाठी २२ कोटींचा फळपीकविमा  
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजूसाठी २२ कोटींचा फळपीकविमा

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : हवामानावर आधारित फळपीकविमा योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा, काजूसाठी २२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा हवामानातील बदलांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पीकविमा मंजूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

फळपीक विम्यासाठी शासनाने यंदा न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीची नियुक्ती केली होती. महसुली मंडळामध्ये बसवण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रातून मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन लाभांश निश्चित केला आहे. 

२०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील ३३ हजार १८७ शेतकऱ्यांनी २९ हजार १९० हेक्टर क्षेत्रावर विमा उतरवला होता. त्यासाठी ५० टक्के रक्कम प्रीमियम म्हणून शेतकऱ्यांनी भरली. 

लाभांशामध्ये १७,१८७ काजू बागायतदारांना १२ कोटी ८४ लाख, तर १५,७०८ आंबा बगायतदारांना ९ कोटी ५३ लाख ७४ हजार रुपयांचा लाभांश मिळेल. यामध्ये काजूच्या २८७, तर आंब्याच्या २५० बिगर कर्जदार बागायतदारांचा समावेश आहे. लाभांशाची रक्कम थेट बँकेत जमा केली जाणार आहे.

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा हंगामात वातावरणातील बदलामुळे आंबा उशिरा दाखल झाला, तर काजूचे उत्पादनच घटले. मात्र गतवर्षीच्या तुलनेत लाभांशाची रक्कम निम्म्यावर आली आहे. पीकविम्याचा लाभ वेळेत मिळणार असला तरीही तो नुकसानीच्या तुलनेत कमी असल्याचे बागायतदारांचे मत आहे.

जिल्ह्यात किनारी भागात बसवलेल्या हवामान केंद्रातील नोंदी या तेवढ्या पूरक नाहीत. त्यामुळे या भागातील बागायतदारांना त्याचा लाभ मिळत नाही, असे बागायतदारांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT