दुष्काळ
दुष्काळ  
मुख्य बातम्या

दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता दुष्काळग्रस्तांसाठी वितरित

टीम अॅग्रोवन

मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानापोटीचा सुमारे एक हजार ४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता गुरुवारी (ता. १४) राज्य शासनाने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. केंद्राच्या दुष्काळ संहितेप्रमाणे राज्यातील १५१ तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत देण्यासाठी २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता दिली होती. त्यापैकी मदतीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला होता. आता उर्वरित १ हजार ४५४ कोटी ७५ लाख ५४ हजार ६८० एवढी रक्कम विभागीय आयुक्तांकडे वर्ग करण्यात आली. ही रक्कम तातडीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.  दुसऱ्या हप्त्यात कोकण विभागाला ७.०६ कोटी, नाशिक विभागाला ४४६.४८ कोटी, पुणे विभागाला २०६.५९ कोटी, औरंगाबाद विभागास ५२५.२९ कोटी, अमरावती विभागास २३७.१८ कोटी आणि नागपूर विभागास ३२.१३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. येत्या ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सूचना संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व पुणे विभागास पहिल्या हप्त्याची १ हजार ४५४ कोटी ७५ लाख ५४ हजार ६८० एवढी रक्कम २९ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT