मानवी टाकाऊ घटकांचा समावेश असलेल्या सांडपाण्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असतात. त्यातील नत्र, स्फुरद आणि पालाश अशा पोषक घटकांचा पुनर्वापर खते म्हणून कृषी उत्पादकता वाढीसाठी करणे शक्य असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधनाचे निष्कर्ष जर्नल नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाण्याच्या प्रमाणामध्येही प्रचंड वाढ झाली आहे. सांडपाण्यामुळे पाण्याचे स्रोत खराब होत असून, प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी मानवी विष्ठेचा समावेश असलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी नवे प्रारूप विकसित केले आहे. या पाण्यातील नायट्रोजन, पोटॅशिअम आणि फॉस्फरस वेगळे करून त्याचा वापर कृषी क्षेत्रामध्ये पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी करता येईल. स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीचे प्रा. जेरेमी गेस्ट यांनी सांगितले, की पिकाच्या वाढीसाठी आपण खतांचा वापर करतो. त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश अशा मूलद्रव्यांचा समावेश असतो. ही सारी मूलद्रव्ये मानवी विष्ठेसह सांडपाण्यामध्ये असतात. सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पामध्ये वेगळी करणे शक्य आहे. या एकरेषीय स्रोत प्रवासाचे अभियांत्रिकीद्वारे पोषक घटकांच्या चक्रामध्ये रूपांतर शक्य असून, त्यातून अनेक संधी तयार होतील. त्याचा पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि कृषीक्षेत्राला फायदा होईल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.