चेरी टोमॅटोसारख्या पिकामध्ये सिंचनाचे प्रमाण अर्ध्याइतके कमी करूनही पिकाचा दर्जा, पोषकता टिकवणेच नव्हे तर वाढवणेही शक्य असल्याचे सेव्हिले विद्यापीठातील संशोधनामध्ये दिसून आले आहे. या टोमॅटोतील कॅरोटिनॉइड संयुगांची पातळीही वाढल्याने प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्तता वाढणार आहे. थोडक्यात नैसर्गिक रंग, अ जीवनसत्त्वाचे अधिक प्रमाण आरोग्यासाठी आणि प्रसाधनासाठी फायद्याचे राहणार आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘फूड केमिस्ट्री’ या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
स्पेन येथील सेव्हिले विद्यापीठामध्ये तीन वर्षांपासून चेरी टोमॅटोच्या दोन जाती व अन्य दोन प्रकारच्या विशेषतः शरद आणि वसंत अशा दोन्ही ऋतूंमध्ये घेता येऊ शकणाऱ्या जातींचेही विश्लेषण करण्यात आले. पिकाच्या वाढीच्या काही टप्प्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास उत्पादनाला मोठा फटका बसतो. अशा संवेदनशील अवस्था वगळून अन्य काटक अवस्थामध्ये पाण्याचे प्रमाण नियंत्रितपणे कमी करण्यात आले. त्याविषयी माहिती देताना अॅग्रोफॉरेस्ट्रीचे मिरिया कॉरेल यांनी सांगितले, की पिकातील पाण्याचे प्रमाण ठरवून अर्ध्यापर्यंत आणण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, पिकांच्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी पाण्याचे किमान प्रमाण काढण्याचे या संशोधनाचे उद्दिष्ट होते. त्यात पिकांची गरज, आवश्यकता आणि त्यावर येणाऱ्या व सहन होऊ शकणाऱ्या ताणाचे प्रमाण यावर काम करण्यात आले.
कॅरोटिनॉइड काय आहे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.