Crop insurance refunds will be available by the end of January
Crop insurance refunds will be available by the end of January 
मुख्य बातम्या

धरणगाव, जि. जळगाव : पीकविमा परतावे जानेवारी अखेर मिळणार 

टीम अॅग्रोवन

धरणगाव, जि. जळगाव : नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पीकविम्याची भरपाई विमा कंपनीकडून मिळणार असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली. याबाबत तहसीलदारांच्या दालनात विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी अधिकारी, पदाधिकारी आणि निवडक शेतकऱ्यांची बैठक झाली. यात २८ जानेवारीपर्यंत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. 

तहसील कार्यालयात तालुकास्तरीय पीकविमा समितीची बैठक तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी धरणगाव तालुक्यातील एकूण ७ हजार ५ शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पंचनामे झाले असून, ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रारी दाखल केल्या आहेत, अशा शेतकऱ्यांचे नुकसान यादीतील नावे तपासून आयसीआयसीआय लोम्बार्ड या पीकविमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खाती २८ जानेवारीपर्यंत पीकविम्याचे पैसे जमा होणार असल्याचे पीकविमा प्रतिनिधी सागर पाटील यांनी सभेमध्ये सांगितले. तसेच तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मार्चअखेर रक्कम कंपनीकडे प्राप्त होताच त्यांनाही याबाबत लाभ मिळणार असल्याचे सांगितले. 

या प्रसंगी गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी यांचे प्रतिनिधी संजय कोळी, तसेच शेतकरी प्रतिनिधी तथा पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, सचिन पवार पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे आदी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT