Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापसाचा दर आठ हजारांवर स्थिरावला

Aajcha Bazar Bhav : कापूस हंगाम अखेरच्या टप्प्यावर असताना बाजारभावत सध्या चढ -उतार सुरू आहे. मात्र दर आठ हजार रुपयांच्या सरासरीवर स्थिरावला आहे.

Team Agrowon

Cotton Market Update अमरावती : कापूस हंगाम (Cotton Season) अखेरच्या टप्प्यावर असताना बाजारात सध्या चढ -उतार सुरू आहे. मात्र दर आठ हजार रुपयांच्या सरासरीवर स्थिरावला आहे.

गेल्या आठवड्यात कापूस दरांमध्ये (Cotton Rate) थोडी सुधारणा झाल्याने बाजारातील आवक थोडी वाढली होती. आता शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे, याचा अंदाज व्यापारी घेत आहेत. दर वाढण्याची शक्यता थोडी धूसर झाली आहे.

राज्यात यंदा ७८ लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तविला आहे. गेल्या महिन्यात ८० लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. त्यात आता घट झाली आहे.

त्यातून आता शेतकऱ्यांकडील कापूस संपत आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. दरवाढीची अपेक्षा असणारे, मात्र जास्त दिवस थांबू न शकणारे शेतकरी कापूस विकत आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती बाजार समितीत ८०५० ते ८१०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.

येत्या दोन ते तीन आठवड्यांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस आणतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. मार्च महिन्यात कापसाचे दर दबावात होते. कापूस विकल्याशिवाय पर्याय नसलेल्या शेतकऱ्यांनी मार्चपर्यंत कापूस विकला. पण शेतकरी जास्त दिवस थांबू शकत नाहीत, हे माहीत असल्याने व्यापाऱ्यांनी बाजारात दर पडते ठेवले.

शेतकऱ्यांकडे २० टक्के कापूस शिल्लक

दरम्यान, शेतकऱ्यांनी दर वाढत नाहीत हे दिसू लागल्याने विक्री वाढविली. पण, साठवणूक क्षमता असलेले शेतकरी दरवाढ केल्याशिवाय कापूस विकणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर भाव वाढविण्यात आले. सध्याही शेतकऱ्यांकडे २० ते २५ टक्के कापूस शिल्लक असल्याचा अंदाज आहे.

गेल्या वर्षी मार्च व एप्रिलमध्ये कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ९,३०० रुपये भाव मिळाला होता. काही ठिकाणी तर हे दर १० हजारांवर गेले. यंदा कापसाला तो भाव अजूनही मिळालेला नाही. यावर्षी ती अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण दरात होत असलेला चढ-उतार त्यांना संभ्रमित करणारा ठरू लागला आहे.

आता ८ हजार रुपयांच्या सरासरीतच सर्व बाजारपेठांत दर असल्याने आगामी काळात त्यात वाढ होण्याचे चिन्हे नाहीत. त्यामुळे आगामी खरीप हंगाम बघता साठवून ठेवलेला कापूस बाजारात येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली.

देशात तीन कोटी गाठींचे उत्पादन झाले आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांकडे साठ लाख गाठींचा कापूस शिल्लक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार करता त्यांच्याकडे २० टक्के साठा शिल्लक आहे. पंधरा लाख गाठींसाठी 7७५ लाख क्विंटल कापूस शिल्लक असल्याचा अंदाज आहे. गरजू शेतकरी खरिपासाठी कापूस विकतील. मोठे शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने साठा ठेवतील.
- गोविंद वैराळे, कापूस विषयाचे अभ्यासक, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT