Wheat Market
Wheat Market Agrowon
ॲग्रोमनी

Wheat Market : गव्हाला वाढत्या उष्णतेचा यंदाही फटका बसणार का? विक्रमी उत्पादनाचे उद्दीष्ट हुकणार का?

Anil Jadhao 
पुणेः गेल्या वर्षी देशात चांगल्या गहू उत्पादनाची (Wheat Production) अपेक्षा असताना उष्णतेच्या लाटेमुळे सगळं गणित कोलमडून गेलं. गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे केंद्र सरकारला गव्हाची निर्यातबंदी करावी लागली. यंदाही वाढत्या उष्णतेचा (Heat Wave) फटका गव्हाला बसणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
`देशात जानेवारी महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सध्या जमिनीत ओलावा कमी होत असल्याने उष्णतेचा ताण वाढत आहे. याचा परिणाम गहू पिकावर होऊ शकतो,` असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे.
मात्र गहू पिकाच्या उत्पादकतेबाबत आताच अंदाज बांधणं घाईच ठरेल, तसेच अनेक राज्यांत गव्हाचा लवकर पेरा झालेला आहे. तिथं उष्णता वाढली तरी पिकावर फारसा परिणाम होणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  

देशात सध्या गहू दरवाढीने ग्राहकांना चांगलेच जेरीस आणलं आहे. आता सरकारने बफर स्टाॅकमधील गहू खुल्या बाजारात आणल्याने दर ५ टक्क्यांपर्यंत कमी झालेत. मात्र दरातील तेजी कायम आहे. त्यामुळे बाजाराची भिस्त यंदाच्या हंगामावर आहे.

सरकराने यंदा १ हजार १२० लाख टन गहू उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवलं आहे. मागील हंगामात १ हजार ६८ क्विंटल उत्पादन झालं होतं. तर २०२०-२१ मधील हंगामातील उत्पादन १ हजार ९५ लाख टन झाले होतं.

यंदा सरकारने विक्रमी गहू उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवलं आहे. मात्र जानेवारी महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनितील ओलावा कमी होत आहे. त्याचा गहू पिकाला फटका बसू शकतो, असा स्कायमेटचा अंदाज आहे.

पण यंदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह अनेक ठिकाणी गव्हाची लवकर पेरणी झाली होती. गेल्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठीच शेतकऱ्यांनी यंदा लवकर लागवड केली होती. जेणेकरून पिकाची दाणे भरण्याच्या अवस्थेत उष्णतेचा फटका बसणार नाही.

हवामान अभ्यासकांच्या मते जोपर्यंत दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढत नाही आणि रात्रीचे तापमान १५ अंश सेल्शिअसच्या पातळीला राहतं तोपर्यंत गव्हाच्या पिकाला धोका नाही.

अनेक भागांमध्ये सध्या थंडी आहे. या स्थितीचा गहू पिकाला फायदाच होत असल्याचे प्रक्रिया उद्योगातील सूत्रांनीही सांगितले.

हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यात पूर्व, ईशान्य भारत, मध्य पूर्व भारत आणि देशाच्या आणखी काही भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा काहीसे अधिक राहील, असा अंदाज जाहीर केला. तर मार्च महिन्याचा हवामान खात्याचा अंदाज फेब्रुवारीच्या शेवटी येईल.

आगाप पेरणीच्या पिकावर परिणाम नाही

मार्च महिन्यात यंदा तापमान वाढले तरी सरसकट गहू पिकावर परिणाम होणार नाही. कारण देशातील अनेक भागांमध्ये गव्हाची पेरणी लवकर झाली आहे.

म्हणजेच हा गहू काढणीलाही लवकर येईल, असे काही भागातील व्यापारी सांगत आहेत. पण तापमानात जास्त वाढ झाल्यास गहू उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT