Paddy Crop Agrowon
ॲग्रोमनी

Paddy Crop : देशात भात उत्पादन घटलं

देशात यंदा भात लागवड कमी झाली. त्यातच पिकाला पावसाचा फटका बसल्यानं उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळं बाजारातील भात आवक जवळपास १८ टक्क्यांनी घटली.

टीम ॲग्रोवन

पुणेः देशात यंदा भात लागवड (Paddy Sowing) कमी झाली. त्यातच पिकाला (Heavy Rainfall) पावसाचा फटका (Crop Damage) बसल्यानं उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळं बाजारातील भात आवक जवळपास १८ टक्क्यांनी घटली. भाताचे उत्पादन घटल्याने इतर धान्याचेही दर वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.

देशात खरिप हंगामात भाताखाली सर्वाधिक क्षेत्र असतं. तसचं धान्यामध्ये उत्पादनही जास्त होतं. मात्र यंदा १ ते २० ऑक्टोबरपर्यंत बाजारातील भात आवक १८ वर्षांतील निचांकी पातळीवर आहे. हरियाना आणि पंजाब या महत्वाच्या भात उत्पादक राज्यांमध्ये उत्पादन घटल्यानं आवक कमी झाल्याचं सांगितलं जातं. मात्र जाणकारांच्या मते, उत्पादनात जास्त घट नसेल, सरकारच्या अंदाजापेक्षा उत्पादन जास्त घटणार नाही. त्यामुळं काळजी करण्याची गरज नाही. देशात नेमकं किती भात उत्पादन झालं हे पुढील काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल, असंही जाणकारांनी सांगितलं.

तसंच सरकारनं यंदा ५१८ लाख टन भात खरेदी करण्याचं उद्दीष्ट ठेवलं. मात्र यंदा हे उद्दीष्ट साध्य करणं सोपं नसेल. पण उत्तर प्रदेशात काही व्यापारी भाताची प्रतिक्विंटल १६०० रुपयांपासून भाताची खरेदी करत आहेत आणि त्या भाताची विक्री हरियानात हमीभावानं करत आहेत. त्यामुळं उत्तर प्रदेशात हमीभावानं भात खेरदीची संधी सरकारला मिळू शकते.

या २० दिवासांमध्ये जवळपास ३९ लाख टन भाताची आवक झाली. पंजाबमधील भात आवक गेल्या २१ वर्षांतील निचांकी पातळीवर राहिली. पंजाबमध्ये यंदा ११ लाख टन आवक झाली. हरियानातील आवक गेल्यावर्षीपेक्षा जास्त दिसते. मात्र आता हरियाना सरकारने इतर राज्यांतून येणाऱ्या भाताच्या खरेदीवर बंदी घातली. त्यामुळं हरियानातील भात खेरदीचं उद्दीष्ट साध्य होईल की नाही, याबाबत शंका आहे.

हरियाना आणि पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या पावसानंही आवक कमी झाली. या दोन्ही राज्यांतील भात काढणी पावसामुळं ठप्प झाली होती. परिणामी बाजारातील भात आवकही घटली. पुढील काही दिवसांमध्ये आवक वाढेल, असं येथील व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यातच सरकारकडे मागणी हंगामातील भाताचा साठाही यंदा घटला. त्याचाही परिणाम बाजारावर होतोय. तर भाताचे दर वाढल्यास इतर धान्याचे दर वाढतील, असाही अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय

उत्पादन कमी राहण्याच्या अंदाजामुळं बाजारात हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहेत. यंदा सरकारनं भातासाठी २ हजार ४० रुपये हमीभाव जाहीर केलाय. देशभरात भाताला सरासरी २ हजार ७३ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र हरियानात २ हजार १०० रुपये आणि पंजाबमध्ये २ हजार ६० रुपयाने भाताचे व्यवहार होत आहेत. देशातील भात उत्पादन किती घटलं, हे स्पष्ट झाल्यानंतर दर आणखी सुधारु शकतात, असाही अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT