नवी दिल्ली ः देशातील विविध भागांत रब्बी पीक पेरणी वेगाने सुरू अाहे. शुक्रवार (ता. १०) पर्यंत देशात १६३.२५ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे पीक क्षेत्र अठरा टक्क्यांनी अधिक अाहे, असे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अाकडेवारीवरून दिसून अाले अाहे.
देशातील विविध भागांत परतीचा पाऊस चांगला झाला. त्याचा रब्बी हंगामाला फायदा झाला अाहे. जमिनीत ओलावा कायम असल्याने रब्बी पेरणी क्षेत्र पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता अाहे.
गहू पीक पेरणी क्षेत्र २७.३९ लाख हेक्टरवर पोचले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २५.७२ लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली होती. मध्य प्रदेशमध्ये अधिक क्षेत्रावर गहू पेरणी झाली अाहे. कडधान्यांची पेरणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक अाहे.
अातापर्यंत ६३.७९ लाख हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली अाहे. यात हरभरा ४७.२० लाख हेक्टर, मसूर ६.८२ लाख हेक्टर अाणि उडीद १.१७ लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश अाहे. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्रात कडधान्ये पेरणी क्षेत्र अधिक अाहे.
तेलबिया पिकांची पेरणी ४०.९४ लाख हेक्टरवर झाली अाहे. यात मोहरी पीक क्षेत्राचा अधिक समावेश अाहे. ज्वारी, बाजरी, मका अादी पिकांची २३.४१ लाख हेक्टरवर पेरणी झाली अाहे. रब्बीतील भात लागवड ७.७३ लाख हेक्टरवर पोचली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाने दिली अाहे.