sowing kharif
sowing kharif 
ॲग्रोमनी

खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढे

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने खरिपाचा पेरा सरासरी लागवड क्षेत्रापेक्षाही अधिक झाला आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र १० लाख ६६ हजार हेक्टर असून गुरुवारपर्यंत (ता.१०) देशात ११ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. तर, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६ टक्के अधिक पेरा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली.  देशात यंदा जून महिन्यात मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला. पेरणीयोग्य वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकत्या घेतल्या. महत्त्वाच्या खरीप उत्पादक राज्यांत पावसाने यंदा सुरुवातीपासून चांगली हजेरी लावली. त्यामुळे या राज्यांमध्ये पेरण्या लवकर उरकल्या, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली. खरिपातील बहुतेक पिके ही मॉन्सूनच्या पाण्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे देशात जसाजसा मॉन्सून बरसत गेला, तसतशा पेरण्याही होत गेल्या. पाऊस चांगला झाल्याने यंदा सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन लागवड झाली आहे.   देशात यंदा भरडधान्य पिकांची पेरणीतही यंदा १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १७७ लाख हेक्टरवर भरडधान्य पिके होती. यंदा आत्तापर्यंत १८० लाख हेक्टरवर या पिकांचा पेरा झाला आहे. कापसाच्या लागवडीतही दोन टक्क्यांनी वाढ झाली असून आत्तापर्यंत १२९ लाख ३० हजार हेक्टरवर कापूस आहे. गेल्यावर्षी १२६ लाख ६१ हजार हेक्टरवर कापसाचे पीक होते. तर, सरासरी क्षेत्र १२० लाख ९७ हजार हेक्टर आहे. ऊस लागवडीतही क्वचित वाढ झाली असून ५२ लाख ४६ हजार हेक्टरवर ऊस आहे. गेल्यावर्षी ५१ लाख ७५ हजार हेक्टरवर उसाचे पीक होते. भात लागवडीत वाढ खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या भाताची यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त लागवड झाली आहे. तसेच सरासरी क्षेत्रापेक्षाही अधिक लागवड यंदा झाली. गेल्यावर्षी भाताची ३७४ लाख हेक्टरवर भाताचे पीक होते. तर, आत्तापर्यंत ४०२ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. भात उत्पादक पट्ट्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला. परिणामी यंदा भात लागवड वाढली आहे.

कडधान्याच्या पेरणी ५ टक्क्यांनी अधिक कडधान्य लागवडही यंदा ५ टक्क्यांनी वाढली आहे. देशातील कडधान्याचे सरासरी क्षेत्र १२८ लाख ८८ हजार हेक्टर आहे. तर मागील वर्षी १३१ लाख ७६ हजार हेक्टरवर कडधान्य पिकांची लागवड झाली होती. यंदा गेल्यावर्षीपेक्षा आणि सरासरी क्षेत्रापेक्षाही ५ टक्के अधिक लागवड झाली आहे. आत्तापर्यंत कडधान्य पिकांची १३७ लाख ८७ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

तेलबिया पिकांच्या पेरणीत सर्वाधिक १०.८ टक्के वाढ केंद्र सरकारने तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या हमीभावात वाढ करून तसेच इतर मार्गांनी शेतकऱ्यांना तेलबिया लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे. परिणामी तेलबिया पिकांची लागवड यंदा १०.८ टक्क्यांनी वाढली आहे. देशात तेलबिया पिकांचे सरासरी क्षेत्र १७८ लाख ८ हजार हेक्टर आहे. तर, मागील वर्षी खरिपात १७६ लाख ९१ हजार हेक्टरवर तेलबिया पिकांचा पेरा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT