नवी दिल्ली ः यंदाच्या रब्बी हंगामात देशातील हरभरा पीक क्षेत्र ३५-४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता अाहे, असे केंद्रीय कृषी सचिव शोभना पटनायक यांनी म्हटले अाहे. गेल्या वर्षी देशात हरभरा पीक क्षेत्र ९.९ दशलक्ष हेक्टरवर होते. यंदा त्यात वाढ होणार असल्याचे संकेत कृषी मंत्रालयाने दिले अाहेत.
अातापर्यंत देशात १३.४ दशलक्ष हेक्टरवर हरभरा लागवड झाली अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६५. दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली होती. अातापर्यंत हरभरा पिकासाठी पोषक हवामान राहिले अाहे. यामुळे पीक क्षेत्र वाढणार अाहे, असे श्री. पटनायक यांनी सांगितले.
कृषी मंत्रालयाच्या अाकडेवारीनुसार, २०१६-१७ या वर्षात देशात ९.३ दशलक्ष टन हरभरा उत्पादन झाले होते. हे उत्पादन याअाधीच्या वर्षापेक्षा ३१.७ टक्क्यांनी अधिक अाहे. यंदा (२०१७-१८) देशातील एकूण कडधान्ये उत्पादन २२ दशलक्ष टन होण्याचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी २२.९५ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.
खरिपातून कडधान्याचे कमी उत्पादन राहिल्याने रब्बीतून ही उणीव भरून काढली जाईल, असेही श्री. पटनायक यांनी स्पष्ट केले अाहे.
देशात गेल्या वर्षीचा अधिक कडधान्ये साठा शिल्लक अाहे. यामुळे यंदा देश कडधान्ये उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार अाहे, असाही दावा त्यांनी केला अाहे.
कडधान्यांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन
गेल्या वर्षी देशात ६.६ दशलक्ष टन कडधान्यांची अायात झाली. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत अतिरिक्त पुरवठा राहिला. परिणामी दर घसरले.
या पार्श्वभूमीवर कडधान्यांच्या दराला बळकटी मिळावी तसेच शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकराने नुकतीच पिवळ्या वाटाण्यावरील अायात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढविले अाहे. तसेच कडधान्ये निर्यातीवरील निर्बंध हटविण्यात अाले अाहेत.