ग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन दशकांपूर्वी सुरू झालेल्या आयटीसी लि.चा ‘ई चौपाल’ हा उपक्रम २०१९ च्या मध्यावधीपर्यंत मोबाईल व्यासपीठावर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. `ई चौपाल ४.०’ हे व्यासपीठ कृषी क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसाठी उत्तम ठरू शकते. आयटीसीच्या वतीने ग्रामीण भागातील सुमारे ३५ हजार खेड्यांमध्ये ६१०० कियॉस्कद्वारे इंटरनेटची सुविधा पोचवली जात असून, त्याचा ४० लाख शेतकरी फायदा घेत आहेत. सध्या उपलब्ध माहिती केंद्राच्या डिजिटल व्यासपीठामध्ये मोबाईल अॅप्लिकेशनची भर घालण्यात येत असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांसोबत स्टार्टअप कंपन्यांनाही होऊ शकतो. त्याविषयी माहिती कृषी आणि माहिती तंत्रज्ञान व्यवसाय प्रमुख एस. शिवकुमार यांनी सांगितले, की आम्ही सध्या २० पेक्षा अधिक कृषी स्टार्टअपसाठी सेवा पुरवत आहे. त्यातून शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज, पिकांचे सल्ले, विविध तपासण्यांविषयी स्थाननिहाय माहिती पुरवली जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.