Orange Rate
Orange Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange Rate : कळमना बाजारात संत्र्याला ३२ हजार दर

Vinod Ingole

Nagpur Orange Market News : कळमना बाजार समितीत (Kalmana APMC) मृग बहरातील संत्रा (Orange Arrival) फळांची आवक वाढली असून, बाजार नारंगी फळांनी सजला आहे. सध्या नागपुरात या फळांना २६ ते ३२ हजार, तर अमरावती जिल्ह्यातील खासगी मंडीमध्ये ३० ते ३७ हजार रुपये प्रति टन असा दर (Orange Rate) मिळत आहे.

उन्हाळ्यात मृग बहराचे व्यवस्थापन होत असल्याने या पिकाच्या व्यवस्थापनावर अधिक लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मृग बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मर्यादित राहते. सिंचनाच्या पर्याप्त सोयी असलेले शेतकरीच मृग बहराचे व्यवस्थापन करतात.

सध्या मृगाच्या फळांचा हंगाम सुरू असल्याने कळमना बाजारात आवक वाढली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला कळमना बाजारात लिलावाच्या माध्यमातून मोठ्या आकारच्या संत्रा फळांना ३५ ते ४६ हजार रुपये प्रति टन असा दर मिळाला.

त्या वेळी आवक १२०० क्‍विंटल होती. सात फेब्रुवारीच्या दरम्यान आवक ३००० क्‍विंटलवर पोहोचली, तर दर ३५ ते ४५ हजार रुपये असे होते. १८ फेब्रुवारीपासून मात्र आवक २५०० क्‍विंटल आणि दर ३० ते ३७ हजार रुपयांपर्यंत आले.

सद्यःस्थितीत बाजारात २६ ते ३२ हजार रुपये या दराने संत्र्याचे व्यवहार होत आहेत. कळमना बाजार समितीत लिलाव प्रक्रियेतून खरेदी होते.

दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात खासगी मंडी आहेत. येथून थेट देशभरातील व्यापारी चांगल्या प्रतीचा माल खरेदी करतात. ग्रेडिंग, कोटिंग करून या भागात संत्रा विकला जातो. त्यामुळे त्यांची टिकवण क्षमता आणि चकाकी चांगली राहते.

त्यामुळेच या भागातून संत्रा खरेदीला व्यापारी प्राधान्य देतात. ग्रेडिंग, कोटिंगचे १५ प्रकल्प या भागात नजीकच्या काळात उभे राहिले आहेत. त्यामुळेच अमरावती जिल्ह्यात खासगी मंडींमध्ये ३० ते ३७ हजार रुपये टन असा दर संत्र्याला आहे.

या वर्षी वातावरणातील बदलाच्या परिणामी एक ते दीड लाख टन संत्रा फळांच्या उत्पादकतेचा अंदाज आहे. या भागात निर्यातीला चालना देण्यासाठी संत्रा निर्यात सुविधा केंद्र गरजेचे असून, त्याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा महाऑरेंजने व्यक्‍त केली आहे.

कळमना बाजार समिती परिसरात तसेच जिल्ह्यात ग्रेडिंग, कोटिंग सुविधा नसल्याने अनेक कंपन्या अमरावती जिल्ह्यातून संत्रा खरेदीवर भर देतात. त्यामुळेच या भागात दर अधिक राहतात. मृग बहरांच्या फळांमध्ये गोडवा अधिक राहतो. याचे व्यवस्थापनात मार्च अखेरपर्यंत झाडांना पाणी देण्याची गरज राहते. त्यामुळे पाण्याची सोय असलेले शेतकरी या बहराचे व्यवस्थापन करतात.
श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT