तंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांची शेती होणार हायटेक
तंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांची शेती होणार हायटेक  
कृषी शिक्षण

तंत्रज्ञानाच्या बळावर ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांची शेती होणार हायटेक

Vinod Ingole

नागपूर : कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या घरच्या शेतीला कृषी विद्यापीठ व देशाअंतर्गत तंत्रज्ञानाची जोड देत आधुनिक शेतीचे मॉडेल विकसित केले जाणार आहे. देशातील अशा प्रकारच्या पहिल्या पथदर्शी प्रकल्पासाठी राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्याकरिता कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांचा डेटाबेस संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

कृषी विद्यापीठाद्वारे विकसित तंत्रज्ञान बांधावर पोचत नाही, अशी ओरड सातत्याने होते. त्यावर उपाय म्हणून कृषी अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या घरची शेती तंत्रज्ञानाच्या बळावर विकसित करण्याचा प्रयत्न राहुरी कृषी विद्यापीठाद्वारे केला जाणार आहे. देशात पहिल्यांदाच अशाप् रकारची संकल्पना मांडली गेली आहे. बीएससी (कृषी) हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. प्रवेशित बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात व त्यांच्या कुटुंबीयांची शेती राहते. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने त्यांच्यामार्फतच तंत्रज्ञान विस्ताराची संकल्पना मांडली आहे. त्याकरिता पहिल्या टप्प्यात प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांकडे असलेल्या शेतीची सर्वांग माहिती घेण्यात येत आहे. त्यामध्ये एकूण जमीनधारणा, मातीचा प्रकार, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, सध्या घेत असलेली पिके या बाबींचा समावेश आहे.

दहा जिल्ह्यात राबविणार प्रकल्प राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्‍चिम महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये आहे. या दहा जिल्ह्यांत ही अभिनव संकल्पना राबविली जाणार आहे. या दहा जिल्ह्यांतील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शेतावरच तंत्रज्ञानविषयक प्रयोग राबविले जातील. विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ, तसेच देशपातळीवरील संशोधनाची माहिती घ्यावी. हे तंत्रज्ञान सुटीत ज्या वेळी विद्यार्थी गावी जाईल; त्या वेळी त्याने आपल्या कुटुंबीयांशी शेअर करून त्याचा अवलंब प्रत्यक्ष शेतीत करावा, असे अपेक्षित आहे. या माध्यमातून शेतीक्षेत्रात मोठे परिवर्तन होईल, अशी अपेक्षा कृषी विद्यापीठाला आहे.

केव्हीकेशी जोडणार शेती कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या शिवारापर्यंत तंत्रज्ञान पोचते किंवा नाही; तसेच त्याचा अवलंब योग्य प्रकारे होतो किंवा नाही यावर त्या भागातील केव्हीके; तसेच कृषी विस्तार केंद्रांचा वॉच राहील, अशी माहितीदेखील कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी दिली.

देशात सर्वाधिक कृषी महाविद्यालय महाराष्ट्रात आहेत. प्रवेशित विद्यार्थ्यांची व अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या शक्‍तीचा उपयोग कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी झाल्यास त्याचे निश्‍चितच सकारात्मक परिणाम दिसतील. आम्ही या संकल्पनेवर काम सुुरू केले आहे. - डॉ. के. पी. विश्‍वनाथा, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT