कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बरसेल परतीचा मॉन्सून
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बरसेल परतीचा मॉन्सून 
कृषी सल्ला

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात बरसेल परतीचा मॉन्सून

डॉ. रामचंद्र साबळे

परतीचा माॅन्सून मराठवाड्याचा भाग वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच भागांत तुरळक ठिकाणी  राहील. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे पावसाचा जोर फारसा राहणार नाही.

राजस्थान ते श्रीनगर आणि राजस्थान ते गुजरातचा पश्‍चिमेकडील भाग या भागावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे तेथील पाऊस थांबेल. मात्र हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेकडील तमिळनाडूपर्यंत १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे.

महाराष्ट्राचा कोकणपट्टीचा पश्‍चिम भाग आणि पश्‍चिम कर्नाटक व केरळच्या भागावरही १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे तेथेही पावसाचे प्रमाण कमी होईल. ता. १ ऑक्‍टोबर रोजी या स्थितीत बदल होऊन पश्‍चिम महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होईल. मात्र उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांच्या पूर्व भागावर हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल इतका कमी राहील. ता. १ ऑक्‍टोबर रोजी बंगालचा उपसागर, हिंदी महासागर या भागांवर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वारे दक्षिणेकडून भारताच्या भागात मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणतील. बंगालच्या उपसागरावर १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढेल. पूर्वेकडील उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत हवामान बदल जाणवतील.

ऑक्‍टोबर महिन्यात हवामान बदलामुळे भारताच्या पूर्वभागात चांगल्या पावसाची शक्‍यता निर्माण होईल. मात्र या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील पश्‍चिम भागातील काही भाग व मराठवाडा भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात या आठवड्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता राहील. ता. ३० रोजी दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील. ऑक्‍टोबर महिन्यात ता. ४ व ५ रोजी पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहील. ता. १ ते ७ ऑक्‍टोबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात हलक्‍या स्वरूपात पावसाची शक्‍यता राहील.

मराठवाड्याचा भाग वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच भागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता राहील. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे पावसाचा जोर फारसा राहणार नाही. पावसाचे प्रमाण केवळ ३० सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगलीचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात अधिक राहील. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी म्हणजे अल्प प्रमाणात राहील. मराठवाड्यात प्रमाण कमी राहील.

कोकण

कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक ३० रोजी २० ते २५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, रायगड जिल्ह्यात ७ मिलिमीटर तर ठाणे जिल्ह्यात केवळ १ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ता. ३० सप्टेंबरनंतर कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होईल.  

उत्तर महाराष्ट्र

या आठवड्यात पावसाची शक्‍यता कमी राहील. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.  

पश्‍चिम महाराष्ट्र

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २५ ते २९ मिलिमीटर व सातारा जिल्ह्यात २० मिलिमीटर, सोलापूर जिल्ह्यात १० मिलिमीटर व पुणे जिल्ह्यात १५ मिलिमीटर आणि नागपूर जिल्ह्यात ४ मिलिमीटर पावसाची शक्‍यता. ता. ३० सप्टेंबर रोजी राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात ता. ३० सप्टेंबर रोजी केवळ १ मिलिमीटर पावसाची शक्‍यता राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता नाही. उघडीप राहणे शक्‍य आहे. हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर परभणी जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित लातूर, नांदेड, बीड व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.  

पश्‍चिम विदर्भ

पश्‍चिम विदर्भात या आठवड्यात पावसाची शक्‍यता कमी राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित बुलडाणा जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि अकोला व वाशीम जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस आणि बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ

नागपूर जिल्ह्यात अत्यल्प २ मिलिमीटर पावसाची शक्‍यता ता. ३० सप्टेंबर रोजी राहील. यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता कमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.  

पूर्व विदर्भ

या आठवड्यात पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता नाही. चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कृषी सल्ला

  • मूग, मटकी, चवळी, उडीद, सोयाबीन, घेवडा या पिकांची काढणी करून धान्य सुरक्षित स्थळी ठेवावे.
  • हळव्या भाताच्या जातींची कापणी करून झोडणी करून धान्य सुरक्षित स्थळी ठेवावे.
  • काढणी केलेले धान्य उन्हात वाळवावे.  
  • करडई व रब्बी ज्वारीची पेरणी चांगल्या ओलाव्यावर करून सारे व पाट पाडावेत.
  • हरभरा पिकाची पेरणी योग्य ओलीवर करावी.
  • - डॉ. रामचंद्र साबळे (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT