रत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे ४० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचल (राजापूर), नाखरे (रत्नागिरी), व्हेळ (लांजा) या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. समिती गुणांकनानुसार पाचल ग्रामपंचायतीला ७३ गुण मिळवले.
ग्रामपंचायतींनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात केलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने ‘स्मार्ट ग्राम’ची तपासणी करण्यात आली. याचे मूल्यांकन ग्रामविकास विभागाकडे होते. जिल्ह्यातील स्पर्धेमध्ये भाग घेणा-या ग्रामपंचायतींनी स्वयंमूल्य निर्धारण करून आपला प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर सादर करावयाचा होता.
पंचायत समितीस्तरावर छाननी होऊन, त्यापैकी तालुक्यातील पहिल्या पाच ग्रामपंचायती निवडल्या. त्यांची तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणी करून प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवड केली. त्याना १० लाख रुपये बक्षीस आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत प्रत्येक तालुक्यातून पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. बक्षीस मिळविलेल्या ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी अभिनंदन केले.
कोण होते त्या समितीत
या बाबींवर गुणांकन सार्वजनिक इमारतीमधील स्वच्छतागृहांचा वापर, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास; केंद्र, राज्य योजनांची अंमलबजावणी, बचतगटांची संख्या, प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, एलईडी बल्बचा वापर, महिला व बालकल्याण खर्च, मागासवर्गीय खर्च, अपंग कल्याणचा खर्च, ग्रामसभेचे आयोजन, वृक्ष लागवड, जलसंधारणाची कामे, संगणकीकृत दाखले व उतारे.
असे मिळाले गुण
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.