द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी रात्रीचे तापमान कमी होत आहे. त्याचा बऱ्याच बागेतील वेलींच्या वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसते. उशिरा छाटणी झालेल्या बागेमध्ये पानांवर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. या स्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ. जुनी बाग ः सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील काही भागांमध्ये फळछाटणी ही डिसेंबर महिन्यात घेण्यात येते. अशा काही भागांमध्ये अडचणी येत असल्याचे दिसते. बागेत शेंडावाढ होत नसल्याची परिस्थिती या वेळी महत्त्वाची समस्या आहे. जर या बागेत मुळे कार्य करत नसल्यास जमिनीतून दिलेले खत वेलीसाठी उपयुक्त ठरत नाही. त्याच प्रमाणे कमी तापमानाचाही वेलीच्या वाढीवर परिणाम होतो. वेलीची वाढ व पानांद्वारे प्रकाश संश्लेषण क्रिया ही ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानांमध्ये चांगल्या प्रकारे होते. घडाच्या विकासामध्ये पानांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक काडीवर घडाच्या पुढे साधारण आकाराचे १० ते १२ पाने आवश्यक असतात. पानांची पूर्तता ही मणी सेंटिगपर्यंत करून घेता येते. त्यानंतर बागेत फुटीची वाढ थांबून घडाचा विकास होण्यास सुरुवात होते. ज्या बागेत सध्या प्रीब्लूम अवस्था आहे, अशा बागेत पानांची परिस्थिती पाहून अन्नद्रव्यांपैकी नत्राचा वापर करावा. या वेळी फवारणीच्या माध्यमातून व जमिनीद्वारे अन्नद्रव्याचा पुरवठा महत्त्वाचा आहे. जर मुळे कार्यरत नसल्याची स्थिती बागेमध्ये असेल, तर बोदावर किंवा बाजूला खोदून घ्यावे. बोदामध्ये पाण्याचे प्रमाण जर जास्त झाल्याने मुळे कार्यरत नसल्याचे स्थिती असेल. अशा वेळी बागेतील पाण्यावर नियंत्रण ठेवावे.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०-२६९५६००१ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.