Vaccination of animals and its benefits
Vaccination of animals and its benefits Agrowon
काळजी पशुधनाची

जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचं !

Roshani Gole

पशुधनाचे संगोपन करत असताना वेळेत प्रतिबंधात्मक लसीकरण (vaccination) अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण उपचारापेक्षा प्रतिबंध बरा (Prevention is better than cure) . जवळपास सर्वच साथीच्या रोगांमध्ये वेळेत योग्य उपचार न झाल्यास, जनावरे मृत्युमुखी पडण्याची संभावना असते. परंतु अजूनही काही भागांमध्ये पशुपालक जनावरांच्या लसीकरणाबाबत टाळाटाळ करताना दिसतात. लसीकरणाबाबत त्यांच्या मनात अनेक संभ्रम दिसतात.

लसीकरणाबाबतच्या शंका (misconception of animal vaccination)-
जनावरांना ज्या ठिकाणी लस दिली जाते, त्या ठिकाणी गाठ येते?
कोणतीही लस दिल्यानंतर सुरुवातीला त्याठिकाणी गाठ येते, काही वेळेस वेदना होतात. अशा ठिकाणी बर्फ लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

साथ आल्यानंतर लसीकरण करून काही फायदा होतो का?
साधारणपणे कोणत्याही रोगाविरुद्ध लसीकरण केल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास तीन आठवड्यांचा कालावधी लागत असतो. या कालावधीत जनावरांना रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठराविक रोगांचे ठराविक अंतराने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचं आहे.

लस दिल्यानंतर जनावरांचे दूध उत्पादन कमी होत असते ?
लस दिल्यानंतर जनावरांच्या शरीरावर तात्पुरता ताण येत असतो. त्यामुळे काही प्रमाणात दूध उत्पादनात घट दिसून येते. परंतु ती तात्पुरती असते.

पावसाळ्याच्या दृष्टीकोनातून जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणं अत्यावश्यक आहे. लसीकरण करून पशुपालक भविष्यात जनावरांवरील उपचारांचा अतिरिक्त खर्च वाचवू शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT