Lumpy Skin
Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Update : लातूरात जनावरांना पुन्हा 'लम्पी स्किन'चा विळखा ; पशुपालकांची चिंता वाढली

Team Agrowon

Lumpy Skin Latur : लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी स्किन आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने पशुपालकांची मात्र चिंता वाढली आहे.

या वर्षाच्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत सुमारे एक हजार २३६ जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये १४५ लम्पीग्रस्त जनावरांचा मृत्यू झाला आहे.

गेल्यावर्षी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात जनावरांमध्ये लम्पी रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचे समोर आले होते. या रोगामुळे हजारो जनावरांचा मृत्यू झाला होता. लम्पी हा जनावरांमध्ये आढळून येणारा त्वचेचा रोग आहे.

लम्पीच्या नियंत्रणासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनावरांच्या लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती. मात्र, आता जनावरांमध्ये पुन्हा एकदा या रोगाची लक्षणे दिसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे.

लसीकरण न झालेल्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव

राज्यात लम्पीच्या नियंत्रणासाठी जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले होते. यानंतर हा रोग नियंत्रणात आल्याचा दावाही केला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागात जनावरांध्ये पुन्हा एकदा लम्पीची लक्षणे दिसायला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी तर या रोगामुळे जनावरांचा मृत्युही झाला आहे.

गेल्यावर्षी आलेल्या लम्पीच्या पहिल्या लाटेदरम्यान लातूर जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली होती. मात्र, यावर्षीच्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील काही भागांमध्ये जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे.

लम्पीच्या पहिल्या लाटेत लसीकरण करण्यात आलेल्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत नाही. मात्र, लसीकरण न झालेल्या जनावरे लम्पीमुळे मृत्युमुखी पडत आहे. ज्यात वासरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

शिरूर अनंतपाळमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळमध्ये जनावरांना लम्पीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षीच्या सप्टेंबरपासून शिरूर अनंतपाळमध्ये ७०२ जनावरांमध्ये लम्पीची लागण झाली असून यापैकी ६४ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

मात्र, योग्यवेळी उपाचार मिळाल्यामुळे ५३७ जनावरे आजारातून बरी झाली आहेत. अद्यापही १०१ जनारांवर उपचार सुरू असल्याचे पशु चिकित्सकांनी सांगितले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT