Solapur Water Crisis Agrowon
ॲग्रो गाईड

Solapur Water Crisis : सोलापुरात पाणी टंचाई तीव्र; हतबल झालेल्या शेतकऱ्यांने चालवली द्राक्ष बागेवर कुऱ्हाड

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई उग्र रूप धारण करत आहे. येथे पाण्याअभावी शेतकऱ्याला पीक ठिकवणे आता जिकरीचे झाले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून रणजित चौगुले या शेतकऱ्याने आपल्या द्राक्ष बागेवर कोयता आणि कुऱ्हाड चालवली आहे. यामुळे सध्या परिसरात याचीच चर्चा सुरू असून राज्यातील सत्ताधारी कधी जागं होणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.

सोलापुरसह राज्यात सध्या दुष्काळ, पाणीटंचाईचे चटके शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहेत. राज्याच्या विविध भागात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे चित्र असताना शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून उभे पीक वाळून जात आहे. सध्या सोलापुर जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसल असून शेती पाण्याविन्या करपत आहे. यावरून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी चौगुले याने आपली तब्बल आठ एकरावरील द्राक्ष बाग तोडली आहे.

यावेळी शेतीला पाणी नसल्याने संतप्त झालेल्या चौगुले यांनी आपली द्राक्ष बाग तोडताना, सरकारने दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत, आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

तसेच आमच्या गावासह जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळाची स्थिती आहे. येथे प्यायला पाणी नाही की शेतीला. यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या बागेला आता कोयता आणि कुऱ्हाड लावण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. याकडे आतातरी सरकारने लक्ष द्यावे. राज्यातील शेतकरी हा जीवंत राहावा म्हणून सरकारने प्रयत्न कारावेत अशी विनंती चौगुले यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT