फळधारणा फळधारणा झालेल्या आंबा बागेमध्ये (वाटाणा अवस्था), फळगळ कमी करण्यासाठी, पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रती झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.उत्पादन व फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१ टक्के ) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लीटर या प्रमाणे फवारणी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना करावी. फळे गोटी ते अंडाकृती आकाराची असताना विद्यापीठाच्या शिफारशीनुसार २५ x २० सें.मी. आकाराची कागदी पिशवी लावावी. यामुळे फळगळ कमी करणे, फळाचा आकार व वजन वाढणे, डागविरहीत फळे आणि फळामधील साक्याचे प्रमाण कमी करणे तसेच फळमाशीपासून संरक्षण असे अनेक फायदे होतात. फुलोरा ते फळधारणा अवस्था काजू पिकामध्ये उशिराने येत असलेल्या नवीन पालवीवर ढेकण्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पालवीच्या संरक्षणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.हवामान पूर्वानुमानानुसार मोहोर अवस्थेत असलेल्या काजू पिकावर ढेकण्या व फुलकिडींच्या वाढीसाठी हवामान अनुकूल दिसत आहे. या किडींच्या बंदोबस्तासाठी मोहोर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.तसेच फळधारणा झालेल्या काजू पिकावर वरील किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (सदर कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.)काजू बिया पूर्ण तयार झाल्यावरच बियांची काढणी करावी. काढणी केलेल्या बिया उन्हामध्ये ७ ते ८ दिवस वाळवून साठवणूक करावी.तापमानात वाढ संभवत असल्याने नारळ बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात. झावळ्यांचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी. सुपारी तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, सुपारी बागेस ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. चिकू
फुलोरा ते फळधारणातापमानात वाढ संभवत असल्याने चिकू बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.चिकू बागेमध्ये बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता करावी. नियंत्रणासाठी फवारणी प्रति लीटर पाणीप्रोफेनोफोस (५० टक्के प्रवाही) १.५ मि. ली. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) ०.५ मि.ली किंवा नोव्हॅल्युरॉन (१० टक्के प्रवाही) ०.५ मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि. ली.टीप ः फवारणी पूर्वी तयार फळांची काढणी करावी.काढणी अवस्थावाल पिकाची काढणी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी करून ४ ते ५ दिवस शेंगा उन्हात वाळवाव्यात. मळणी करावी. किंवा शेंगा झाडावर वाळल्यानंतर पिकाची कापणी करून झाडे खळ्यावर ३ ते ४ दिवस उन्हात वाळवून मळणी करावी. साठवणुकीमध्ये भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे मातीच्या खळीचा थर देऊन चांगले वाळवावे.फळधारणावांगी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. कीडग्रस्त शेंडे व फळे जमा करून नष्ट करावीत.या किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणीडेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) १ मि.ली.उन्हाळी भेंडी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. सायपरमेथ्रीन (२५ टक्के प्रवाही) ०.३ मि.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. ः ०२३५८ -२८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)