काही भागांमध्ये गारपीट किंवा जोराचा पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गारपीट आपत्तीचे व्यवस्थापन तीन टप्प्यामध्ये करता येईल.
राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. अशा स्थितीमध्ये पिकांना कमी अधिक प्रमाणात मार बसल्याची परिस्थिती आहे. खानदेश पट्ट्यामध्ये काही भागामध्ये विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये सोमवार रात्री उशिरापर्यंत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पूर्वी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विदर्भ - मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट झाली. यात काढणीला आलेल्या व शेतात उभ्या असणाऱ्या गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, करडई इ. पिकांना मोठा फटका बसला. सोबतच संत्रा वर्गीय फळबागा, द्राक्ष आणि डाळिंब बागासोबतच टोमॅटो, मिरची, पालक, कोबी अशा भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला होता. यापुढेही काही भागांमध्ये गारपीट किंवा जोराचा पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गारपीट आपत्तीचे व्यवस्थापन तीन टप्प्यामध्ये करता येईल. पूर्वतयारी भारतीय हवामान विभागाकडून मिळणारे हवामानाचे अंदाज पाहणे, मिळवणे आवश्यक आहे. त्यामध्ये गारपीट किंवा तीव्र वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्यास त्या दृष्टीने पिकांच्या बचावाच्या शक्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. गारपीट असताना घ्यावयाची काळजी लोकांसाठी ः गारपिटीदरम्यान लोकांनी घराबाहेर पडू नये. शक्यतो पक्क्या निवाऱ्यामध्ये थांबावे. जनावरे ः आपले पशू, पक्षी निवाऱ्याच्या ठिकाणी ठेवावेत. कुक्कुटपालन किंवा शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पत्र्याचे शेड असल्यास त्यावर पाचट, कडबा, वैरण, गवत, तुराट्या किंवा पऱ्हाट्या टाकून घ्याव्यात. गारपिटीच्या अचानक होणाऱ्या आवाजामुळे हे प्राणी किंवा पक्षी घाबरणार नाहीत. अनेक वेळा केवळ घाबरल्यामुळेही प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू संभवतो. गारपिटीनंतरचे व्यवस्थापन गारपिटीमुळे मोडलेल्या , वाकलेल्या फांद्या कापून काढणे. त्यावर बोर्डो पेस्ट लावावी. गळून पडलेल्या फांद्या, फळे, फुले गोळा करून नष्ट करावेत. नवीन पालवी फुटून जोमाने वाढ होण्यासाठी आवश्यक ती खतमात्रा द्यावी. जनावरांना इजा झाली असल्यास पशूतज्ज्ञांकडून उपचार करावेत. कोंबड्या, शेळीची पिल्ले यांचे लसीकरण करून घ्यावे. मृत पशुपक्ष्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. महत्त्वाच्या उपाययोजना
पीकनिहाय व्यवस्थापन गारपीटग्रस्त पिकांसाठी बारामती येथील अजैविक ताण संशोधन केंद्राने केलेल्या शिफारशी ः मका
वांगी
सीताफळ आणि डाळिंब
- डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.