तुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...
तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून चौथ्या आठवड्यात तुरीच्या दोन ओळीत लाकडी नांगराच्या साह्याने ३० सें.मी. खोल सरी काढावी. सरी काढल्यामुळे पाऊस सरीत मुरविला जाऊन जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होते. पीक पहिले ३० ते ४५ दिवस तणविरहित ठेवावे. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात.
- तूर पिकामध्ये कोळप्याच्या साह्याने पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. त्यामुळे पीकवाढीस पोषक वातावरण तयार होते. तसेच, बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. पीक पहिले ३० ते ४५ दिवस तणविरहित ठेवावे. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात.
- पाऊस कमी झाला असल्यास आणि जमिन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वी आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी द्यावे.
- पेरणी झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून चौथ्या आठवड्यात तुरीच्या दोन ओळीत लाकडी नांगराच्या साह्याने ३० से. मी. खोल सरी काढावी. सरी काढल्यामुळे ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये पडणारा पाऊस सरीत मुरविला जाऊन जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होते व सदरील ओलावा पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरताना उपयोगी पडून उत्पादनात वाढ होते. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथील संशोधानातून तुरीच्या दोन ओळीत सरी काढल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात १५ ते २० टक्के वाढ होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
- कोरडवाहू क्षेत्रात पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर लवकर जातीस पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी फुलोऱ्यात असताना व तिसरे शेगांत दाणे भरताना द्यावे. मात्र, पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. पाऊस नसेल तर जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या अगोदरच पाणी द्यावे.
- जास्त पावसामुळे शेतातून पाणी जास्त वाहिले असल्यास पाण्याबरोबर नत्र वाहून जाण्याची शक्यता असते. तुरीची खालची पाने पिवळी पडली असल्यास नत्राची कमतरता लक्षात घेऊन दोन टक्के युरियाची किंवा दोन टक्के डीएपीची (दोन किलो प्रती १०० लिटर पाणी) फवारणी फायदेशीर ठरू शकते. फवारणी शक्य नसल्यास अशा शेतामध्ये निबोली पेंड एक पोते व युरिया अर्धा पोते प्रतिएकरी कोळपणी देण्यापूर्वी वापरावे.
- जमिनीत गरजेपेक्षा जास्त ओलावा राहणार नाही अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. रोगग्रस्त झाडांच समूळ नायनाट करावा. तुरीचा फुटवा वाढविण्यासाठी ३० व ५५ दिवशी शेंडा खुडणी करावी.
डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर