Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : कडेगाव, माळेगावात पाणीटंचाई कायम

Team Agrowon

Jalna News : तालुक्यात मागील तीन दिवस भीज पाऊस झाला. त्याचा काही भागाला फायदा झाला आहे. मात्र, जिथे सिंचनाचे स्त्रोत नाही. तिथे अद्याप देखील टंचाईची समस्या कायम आहे. त्यात तालुक्यातील कडेगाव आणि माळेगाव या दोन गावांचा समावेश आहे. या दोन्ही गावातून जाणाऱ्या लहुकी नदीला मागील दोन वर्षात एकदाही पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या दोन्ही गावांत पाणी टंचाईची समस्या कायम आहे.

प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांचे कुठलेही सर्वेक्षण न करता शासकीय शिरस्ता पाळत ३१ ऑगस्टपासून टंचाईग्रस्त गावांचे टँकर बंद केले आहेत. शासनाच्या अशा अंधाधुंद धोरणामुळे कडेगाव आणि माळेगाव येथील नागरिक भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा शोध घेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

बदनापूर तालुक्यात मागील दोन वर्षांपासून जेमतेम पाऊस पडत आहे. मागच्या वर्षी तर पावसाने वार्षिक सरासरी देखील गाठली नव्हती. यंदा श्रावणात पाऊस धाऊन आला खरा; मात्र त्याने काही भागात दुजाभाव केला. त्यात रोषणगाव मंडळातील कडेगाव, माळेगाव, वरुडी, कुसळी आदी गावे भरडली गेली आहेत.

अर्थात काही गावातील ग्रामपंचायतींनी किमान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून काही स्त्रोत तयार केले आहेत. मात्र, आजघडीला कडेगाव आणि माळेगाव अशी दोन गावे चक्क पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ आहेत.

त्याला कारण देखील तसे आहे, या दोन्ही गावांत दोन वर्षात अगदीच तुरळक पाऊस झाला. या गावातून जाणारी लहूही नदी नेहमी कोरडीठाक पडलेली असते. त्यामुळे सिंचन आणि पाणीसाठा हा विषय या दोन्ही गावांसाठी नगण्य आहे. एकूणच अशा परिस्थितीत पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी दोन्ही गावे टंचाईच्या संकटात सापडले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

UPSC Success Story : देवडीच्या अश्पाक मुलाणीचे ‘युपीएससी’मध्ये यश

Water Pollution : पुणे परिसरातील प्रदूषित पाणी थेट उजनी धरणात

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी ४५ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

Ujani Dam : दीड महिन्यात उजनीतून सोडले १०० टीएमसी पाणी

Kandalwan : अतिसंवेदनशील कांदळवनांवर सीसीटीव्हीचा वॉच

SCROLL FOR NEXT