Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Ahilyanagar Rain Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; ५० गावांमध्ये शेती व फळबागांचे नुकसान!

Unseasonal Rain Issue: अहिल्यानगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळल्याने ५० गावांतील हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: शेतकऱ्यांना यंदाही अवकाळी पाऊस, वादळाचा सामना करावा लागत असून सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अहिल्यानगर, पारनेर, नेवासा, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, संगमनेर, राहाता तालुक्यांतील अनेक भागांत गुरुवारी (ता. ३) पाऊस झाला. पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून, अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याबरोबर घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, टोमॅटो, वाटाणा तसेच भाजीपाल्यासह फळबागांचेही नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ५० गावांच्या शिवारात फटका बसल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

दोन दिवस झालेल्या पावसात संगमनेरला वीज पडल्याने दोन गायी दगावल्या, तर एका घराची पडझड झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवसांत सुमारे पन्नास गावांत अडीच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर गहू, कांदा, टोमॅटो, वाटाणा, भाजीपाला या पिकांसह आंबा, डाळिंब, द्राक्ष, लिंबू, पेरू या फळबागांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे आंबा, द्राक्ष, संत्र्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे संत्रा व कापणीला आलेल्या गव्हासह संगमनेर, कर्जत, पारनेर आणि अकोले तालुक्यांत अधिक फटका आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील गहू, ज्वारी, मका, आंबा, केळीसह आदी फळबाग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात अनेक गावांमध्ये झाडे उन्मळून पडल्यामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. पहिल्या दिवशी संगमनेर तालुक्यातील १३ गावांमध्ये नुकसान झाले. १ हजार ४८८ शेतकऱ्यांचे ६७७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील २० गावांमध्ये अवकाळीचा तडाखा बसला. ५३ शेतकऱ्यांचे १३.८३ हेक्टरवरील नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील ४ गावांना फटका बसला. २२० शेतकऱ्यांचे ७२ हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले आहे.

पारनेरमधील एका गावाला तडाखा बसला. २५९ शेतकऱ्यांचे १२८.१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे १ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. नेप्ती मंडळात १६, वाडेगव्हाण मंडळात १३, पारनेर मंडळात १३, पळवे मंडळात २०, देवदैठण मंडळात २४, कोळगाव मंडळात १२, बोधेगाव मंडळात १०, ब्राह्मणी मंडळात १०, बारागाव नांदूर मंडळात ८, कोतुळ मंडळात २४, मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी दोन-तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्यास विजा कोसळण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळेस सुरक्षितस्थळाचा आश्रय घ्यावा. शेतकऱ्यांनी पाऊस, वीज व वादळाच्या काळात काळजी घेणे आवश्यक आहे.
डॉ. वीरेंद्र बडधे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT