Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity Over : पाणीटंचाईचा वनवास संपला

Water Issue : सुमारे ५० हजार ४९४ नागरिक आणि जनावरांची जूनअखेरपर्यंत टॅंकरच्या पाण्याने तहान भागवली गेली आहे.

Team Agrowon

Mokhada News : स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोखाडा तालुक्याला प्रति वर्षी पाणीटंचाई भेडसावत आहे. यंदा डिसेंबर २०२३पासूनच मोखाड्यात टंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने जानेवारीपासून टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. पहाटेपासूनच पाणीपुरवठा करणारे टॅंकर धरणाची वाट धरायचे. जूनअखेर तालुक्यात मॉन्सूनचे आगमन झाल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तब्बल सात महिने मोखाड्यातील नागरिकांनी पाणीटंचाईचे चटके सोसले आहेत.

जानेवारी महिन्यात सरकारने मोखाड्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. उन्हाच्या तडाख्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची संख्या वाढत होती. टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून टॅंकर पळसपाडा आणि अप्पर वैतरणा धरणातून पाणी आणण्यासाठी धावत होता.

नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचा दिलीप सोनार हा कर्मचारी नियोजनबद्ध कारभार पाहत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा टंचाईची तीव्रता अधिक होती. त्यामुळे टॅंकरचालक आणि प्रशासनाला नागरिकांची तहान भागवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे.

दर वर्षी जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात मोखाड्यात पाणीटंचाईला सुरुवात होते. यंदा एक महिना अगोदरच डिसेंबरमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या वर्षी २३ टॅंकरद्वारे ७३ गाव-पाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा २६ टॅंकरद्वारे ८८ गाव-पाड्यांना पाणीपुरवठा केला.

तालुक्यातील सुमारे ५० हजार ४९४ नागरिक आणि जनावरांची जूनअखेरपर्यंत टॅंकरच्या पाण्याने तहान भागवली गेली आहे. तब्बल सात महिने मोखाडावासीयांना पाणी टंचाईचे चटके सोसावे लागले आहेत. आता नियमित पाउस सक्रिय झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील विहिरीतील पाण्याची पातळी वाढल्याने टंचाईचे संकट टळले आहे. दररोज पहाटे ४ वाजल्यापासून धावणारे टॅंकर ३० जूनपासून स्थिरावले आहेत.

या गावांना टंचाईचे चटके

गोळीचा पाडा, धामोडी, स्वामीनगर, कुडवा, कुंडाचा पाडा, तेलीऊंबरपाडा, वारलीवाडी, हट्टीपाडा, हेदवाडी, गवरचरीपाडा, ठवळपाडा, राजेवाडी, जांभुळवाडी, हुंड्याची वाडी, धामणी, तुंगारवाडी, मडक्याची मेट, कोलद्याचा पाडा, चारणगाव, वाकीचा पाडा, ठाकुरवाडी, गोमघर, वासिंद, वाघवाडी आणि शेलमपाडा या गावपाड्यांसह सुमारे ८८ गाव-पाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT