Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : वादळी पाऊस, गारपिटीने आठ हजार हेक्टरला तडाखा

Crop Damage : सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाटासह आलेल्या मुसळधार अवकाळी पाऊस व गारपिटीचा रविवारी (ता. १७) जिल्ह्याला मोठा तडाखा बसला.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : सोसाट्याचा वारा, विजेचा कडकडाटासह आलेल्या मुसळधार अवकाळी पाऊस व गारपिटीचा रविवारी (ता. १७) जिल्ह्याला मोठा तडाखा बसला. त्यामुळे तब्बल आठ हजार हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, तीळ, ज्वारी, पपई, संत्रा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी (ता. १७) रात्री व मध्यरात्रीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. वाऱ्यामुळे झाडे उन्मळून विजेच्या तारांवर पडली. घरावरचे छप्पर उडून गेले.

यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्युत तारांवर झाडे पडल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद झालेला होता. त्यामुळे अनेक गावांत अंधारातच होती.

जिल्ह्यासह यवतमाळ शहरात मध्यरात्री पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. अवकाळी पाऊस, वारा, विजेचा कडकडाट त्यातच झालेल्या गारपिटीने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. या सर्वांचा फटका जिल्हाभरातील अनेक गावांना बसला.

आर्णी तालुक्यातील २५, मारेगाव २३, उमरखेड २७ तर दारव्हा तालुक्यांतील २१ गावांत गारपीट झाली. त्यामुळे आठ हजार ३१९.८९ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान उन्हाळी पिकासोबत फळपिकांचे झाले आहे. वाऱ्यामुळे पपईची झाडे उन्मळून पडली. संत्रा, आंबा, लिंबूची पडले आहे. त्यामुळे खरीप, रब्बी नंतर आता उन्हाळी पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.

तालुका-नुकसान (हेक्टरमध्ये)

बाभूळगाव-१२.२०

केळापूर-५०.६९

मारेगाव-१०४.००

उमरखेड-२२७५.००

दिग्रस-२७५.००

झरी-१५.००

कळंब-८.००

पुसद-३९४.००

यवतमाळ-१३०.००

दारव्हा-१८४६.००

आर्णी-३२१०.००

बारा जनावरांचा मृत्यू

वीज कोसळून १२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. त्यात नऊ मोठे, तर तीन लहान जनावरांचा समावेश आहे. वणी तालुक्यात एक, मारेगाव तीन, दिग्रस तीन, झरी एक, दारव्हा दोन तर राळेगाव तालुक्यांतील दोन जनावरांचा समावेश आहे.

आर्णी तालुक्यात १२१ घरांची पडझड

सोसाट्याचा वाऱ्यामुळे घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जिल्ह्यात तब्बल १३२ घरांना वादळी वाऱ्यासह गारपिटीची फटका बसला आहे. आर्णी तालुक्यातील सर्वाधिक १२१ घरांना फटका बसला आहे. याशिवाय मारेगाव, कळंब, पुसद, झरी तालुक्यांतील घरांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT