Stamp Paper Agrowon
ॲग्रो विशेष

Stamp Paper Shortage : ‘मुद्रांकां’चा तुटवडा

Maharashtra Government : प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराची कागदपत्रे करण्यासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांकपत्र वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. परंतु, या मुद्रांक पत्राचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Pune News : प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराची कागदपत्रे करण्यासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांकपत्र वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहे. परंतु, या मुद्रांक पत्राचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो जादा दराने विकत घ्यावा लागत आहे. दरम्यान पाचशे रुपयांचे मुद्रांकपत्र मिळत नसेल, तर शंभर रुपयांची पाच मुद्रांकपत्रे वापरून आपले काम करणे शक्य आहे, असे येथील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

शासकीय कार्यालय सोडून अन्य कामांसाठी म्हणजे प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र आदी कामांसाठी शंभर ते दोनशे रुपयांच्या मुद्रांक पत्राचा वापर केला जात होता. मुद्रांक पत्राची किंमत आणि प्रत्यक्षात त्याच्या छपाईसाठी येणारा खर्च पाहता ही किंमत कमी असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे म्हणणे होते.

त्यामुळे या मुद्रांक पत्राच्या किमतीमध्ये वाढ करावी, असा प्रस्ताव यापूर्वीच विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यास राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात मान्यता देत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात बदल केला. या निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना शंभर अथवा दोनशे रुपयांच्या मुद्रांक पत्राऐवजी प्रत्येक कामासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांकपत्र खरेदी करावे लागते.

त्यामुळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या मुद्रांकपत्राचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी पाचशे रुपयांचे मुद्रांक पत्र सातशे ते आठशे रुपयांना घ्यावे लागत आहे.

यासंदर्भात नाव न देण्याच्या अटीवर मुद्रांकपत्र विक्रेते म्हणाले, ‘‘पाचशे रुपयांचे मुद्रांकपत्र आवश्‍यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. मागणी केल्यानंतर खात्याकडून शंभर रुपयांचे मुद्रांकपत्र उपलब्ध करून दिले जाते. तसेच तेच घेण्यासाठी आग्रह धरला जात आहे.’’

सद्यःस्थिती

अपुरे मनुष्यबळ, तेही अडकले निवडणुकीच्या कामात

राज्यातील मुद्रांक पत्र विक्रेते : साधारण ११००

राज्यात ७ ते ८ आठ लाख वार्षिक मुद्रांक पत्र विक्री, त्यातील २० टक्के विक्री पुण्यात

५००चे मुद्रांक पत्र ७०० ते ८०० विकले जाते.

पुरवठा करण्यात अडचणी

यासंदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी म्हणाले, ‘‘पाचशे रुपयांच्या मुद्रांक पत्राच्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु पाचशे रुपयांऐवजी शंभर रुपयांची मुद्रांक पत्रे वापरून नागरिक आपली कामे करू शकतात. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी तशा सूचनादेखील मुद्रांक विक्रेत्यांना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT