Nashik News : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ या योजनेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर तालुक्यात निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत.
या कामांची चौकशी करण्यासाठी नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना पत्र दिले आहे. खासदार वाजेंनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोळओहळ, नीळउंबर व काकडपाडा येथील पाईपलाईनच्या कामांची पाहणी केली.
त्यात निकृष्ट दर्जाचे काम आढळले. स्थानिक आदिवासी बांधवांनी याबाबत सातत्याने विचारणा करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांची तक्रार आहे.
तरी या कामांची तत्काळ तपासणी करून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदारांनी या पत्राद्वारे केली आहे.
आमच्या आदिवासी भागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून होत असलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. आम्ही वारंवार इंजिनीअर तसेच इतर लोकांकडे याबाबत विचारणा करत असतो मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर दिली जातात.- चिंतामण बुधर, ग्रामस्थ-काकडपाडा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.