Raju Shetty Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्कजाम आंदोलन तूर्तास मागे

Team Agrowon

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या (Sugarcane Producers) प्रश्नावर शुक्रवारी (ता.२५) रोजी राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatna) चक्काजाम आंदोलन करणारी होती. मात्र राज्य सरकारने राजू शेट्टी (Raju Shetty) यांना गुरुवारी (ता.२४) रात्री चर्चेचे आमंत्रण पाठवले. त्यानंतर शुक्रवारी (ता.२५) रोजी नियोजित चक्कजाम आंदोलन मागे घेत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जाहीर केले.

राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या विनंतीवरून उद्याचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन स्थगित करत असून २९ तारखेच्या बैठकीत जर तोडगा नाही निघाला तर ३ डिसेंबर रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन होईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

एकरकमी एफआरपी आणि अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १७ आणि १८ नोव्हेंबरला ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन करण्यात आले. मात्र तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घेतले नाही, असा आरोप करत २५ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते.

राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी २९ नोव्हेंबर रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी चर्चेसाठी पत्र लिहून राजू शेट्टी व शिष्टमंडळाला आमंत्रित केले आहे. या पत्रात २५ नोव्हेंबर रोजी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी केली आहे. या पत्रानंतर राजू शेट्टी यांनी नरमाईची भूमिका घेत तूर्तास चक्काजाम आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र राज्य सरकारने २९ नोव्हेंबर रोजीच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली नाही तर ३ डिसेंबर रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Letter To Raju Shetty

दरम्यान, मागील हंगामात तुटलेल्या ऊसाला एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये द्यावेत, दोन टप्प्यातील एफआरपी ऐवजी एकरकमी एफआरपी द्यावा, काटामारीत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी, साखरेचा किमान विक्री किंमत ३१ वरून ३५ रुपये करावा, इथेनॉल विक्रीमध्ये शेतकऱ्याला ७० टक्के हिस्सा मिळावा, खुल्या साखर धोरणातंर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी, अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर संकुलावर धडक मोर्चा काढला होता.

त्यानंतर स्वाभिमानीच्या वतीने १७ व १८ नोव्हेंबरला राज्यातील ऊस तोड व वाहतुक बंद आंदोलन करण्यात आले. मात्र राज्य सरकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून राज्यभर २५ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. मात्र राज्य सरकारकडून चर्चेसाठी बोलवल्यामुळे तूर्तास २५ नोव्हेंबरच्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT