raju shetti agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipith Mahamarg : देव देवतांच्या नावाखाली सरकारचा १२ हजार कोटींच्या घोटाळा : राजू शेट्टी

sandeep Shirguppe

Maharashtra Government : राज्य सरकारने पवणार (जि.वर्धा) ते पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग)पर्यंत ८०५ किलोमीटर लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाला दिलेल्या मंजुरीमुळे शेतकऱ्यांची ११ हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन अधिग्रहण केली जाणार आहे. वास्तविक पाहता रत्नागिरी- नागपूर हा महामार्ग या शक्तिपीठ महामार्गाला समांतर असल्याने केवळ देव देवतांच्या नावाखाली राज्य सरकारने भूमी अधिग्रहण व रस्ते बांधकामात १२ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा करण्यासाठी हा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा अट्टाहास धरलेला आहे. अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

माजी खासदार शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, शक्तिपीठ महामार्गाला समांतर असणाऱ्या रत्नागिरी -नागपूर या महामार्गाचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले आहे. कोल्हापूरपासून ते नागपूरपर्यंत याच महामार्गाला लागून हा महामार्ग होणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी -नागपूर या महामार्गावरती शक्तिपीठ महामार्गांमधील दाखविण्यात आलेले विविध तीर्थक्षेत्रे असताना सरकारने ८६ हजार कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर करून हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या खिशावरती दरोडा टाकण्यातला प्रकार होणार आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून शक्तिपीठ महामार्गाची अत्यंत घाईगडबडीत राज्यपालांच्या सहीने अधिसूचना जारी केली आहे. याबरोबरच महामार्गाचा संभाव्य नकाशा व यामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचे गट नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्य सरकारने हा अनागोंदी कारभार करत असताना वस्तुस्थितीचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित होते.

संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रत्नागिरी -नागपूर महामार्गाला समांतर असल्याने दोन्हीही रस्ते टोलचेच असल्यामुळे दोन्ही रस्त्यावरील वाहतूक विभागली जाऊन पुन्हा २५ ते ५० वर्षे जादा टोल जनतेला भरावा लागेल. या सर्व गोष्टी अतितातडीने होत असताना राज्य सरकारने या संदर्भातला अहवाल तयार करणे गरजेचे होते. सध्याच्या महामार्गावर होणारी वाहतूक व पुढील पंचवीस वर्षांमध्ये होणारी वाहतुकीतील वाढ, या रस्त्यावरती होणारा खर्च तसेच दोन्ही प्रकल्पाच्या झालेल्या खर्चाची वसुली होण्यासाठी लागणारा कालावधी या संदर्भातला कोणताच अभ्यास राज्य सरकारने केलेला नाही.

शक्तिपीठ महामार्गातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांवरती होणाऱ्या पुलामुळे महापुराची परिस्थिती गंभीर होणार आहे. जवळपास २५ ते ३० गावांना या पुराचा फटका बसणार असून हजारो एकर शेती नापीक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने सवंग लोकप्रियतेसाठी शेतकऱ्यांना भूमीहीन करुन शेतकऱ्यांच्या प्रपंचावर महामार्गाचा बुलडोझर फिरवून वीस हजार कोटी रुपये पेक्षा जास्त भ्रष्टाचार करण्याचा डाव असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गामध्ये अनेक नेते व अधिकाऱ्यांची समृद्धी झाली पण यात शेतकऱ्यांची राख रांगोळी झाली. त्याच पद्धतीने शक्तीपीठ महामार्गात सुद्धा भ्रष्टाचार करण्याचा डाव राज्य सरकारमधील बडे नेते मंत्री व अधिकाऱ्यांनी रचलेला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शक्तिपीठ महामार्गावरील बाराही जिल्ह्यामधून शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करायला सुरुवात केली असून सरकारने याचा गंभीरपूर्वक विचार करावा अन्यथा सरकारला एक इंच ही जमिन संपादित करू दिली जाणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT