Rain Fall Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update Today : कोकणासह कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस

Team Agrowon

Maharashtra Rain Update : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत बुधवारी (ता. ८) जोरदार पाऊस झाला. पुण्यातील काही भागांत देखील हलक्या पावसाने हजेरी लावली.

कोकणात विशेष जोर राहिलेल्या पावसाने भात पिके आडवी झाली. त्यामुळे ऐन पिके काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सातारा, सांगलीत द्राक्षबागांत पाणी साचले. त्यामुळे या बागा रोगराईच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. पहाटेपर्यंत पावसाचा धुमाकूळ सुरूच होता. त्यामुळे कापलेले भात ओला झाला. काही ठिकाणी उभे भात पीक आडवे झाले. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरणामुळे भात सुकवणे शक्य झालेले नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील भाताचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मंगळवारी (ता. ८) रात्रीपासून पाऊस सुरू झाला. कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे कापणी केलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्याच्या सर्व भागात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भातपीक कापणीला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्के भातपिकाची कापणी पूर्ण झाली आहे. अद्याप ५० टक्के कापणी शिल्लक आहे.

त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप दुपारपर्यंत सुरूच होती. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला.

माण, खटाव, कऱ्हाड, वाई, पाटण व सातारा तालुक्यांतील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यातील काही भागांत जोरदार तर काही भागांत रिपरिप पावसाने हजेरी लावली. सध्या द्राक्ष बागा फुलोरावस्थेत असून या पावसाचा द्राक्ष बागेला फटका बसण्याची शक्यता आहे.

बागेत डाऊणी आणि घडकुज होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे. परंतु रब्बी हंगामातील पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळणार असल्याचे चित्र आहे. पलूस तालुक्यात जोरदार पावसाने द्राक्ष बागेत पाणी साचले आहे.

आटपाडी तालुक्यातही हलक्या पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्यातील डफळापूर भागात जोरदार पाऊस झाला. कवठेमहांकाळ तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून द्राक्ष बागेत पाणी साचले आहे.

कोल्हापुरात ऊस पिकाला दिलासा

कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. पाण्याअभावी कोमेजलेल्या ऊस पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे.

ओलीअभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना वेग येणार आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत तुलनेने हलका पाऊस झाला. या पावसामुळे कोरड्या वाफशावर झालेल्या रब्बी पेरण्यांना दिलासा मिळाला. वाढीच्या अवस्‍थेत असणाऱ्या रब्बी पिकांनाही हा पाऊस उपयुक्‍त ठरेल, असे कृषी विभागाच्‍या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT