Nanded News : रब्बी हंगामात विजेच्या अनियमित वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे खरिपानंतर रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. सात दिवस रात्री आठ तास, तर सात दिवस दिवसा आठ तास कृषी पंपासाठी वीज दिली जाते. परंतु दिवसा वीज टिकत नाही, तर रात्री थंडीमुळे पाणी देता येत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे पावसाने नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. खरिपातील खर्च निघेल इतके उत्पादन झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सून्नोत्तर पावसामुळे जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे यंदा शेतकऱ्याने रब्बी पेरणीला सुरुवात केली. सध्या नांदेड जिल्ह्यात रब्बी पीक पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी होते.
यानंतर गहू, रब्बी ज्वारी, तीळ, मका या पिकाची पेरणी करण्यात येते. या पिकांना लागणाऱ्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी कूपनलिका तसेच विहिरीवर विद्युत मोटारीची जोडणी केली. परंतु वीज टिकत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या जिल्ह्यात सात दिवस दिवसा तर सात दिवस संध्याकाळी थ्री फेस वीज शेतकऱ्यांना दिली जात आहे.
दिवसा वीज असलेल्या वेळेत ती टिकत नाही. अनेकवेळा ट्रीप होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत. तर रात्रीच्या विजेची वेळ थंडीच्या काळात असल्यामुळे शेतकऱ्यांची भिजवण्याची गैरसोय होत आहे.
कृषी पंपाना दिवसा बारा तास योग्य दाबाची वीज मिळावी, यासाठी मागील अनेक दिवसापासून शेतकरी मागणी करत आहेत. परंतु सरकार याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.