Soybean Farming: पावसाचा दीर्घ खंड आणि सातत्याने असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तालुक्यात सोयाबीनसह अन्य खरीप पिकांवर किडी आणि अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या सोयाबीन फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, पिकांना मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. वारंवार फवारणी करूनही किडींचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने उत्पादनात घट होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत आहेत..किल्लेधारूर तालुक्यात ४६ हजार हेक्टर खरीप पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ४३ हजार हेक्टर म्हणजेच ९५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. ४ व ५ जून रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली. पिकांची उगवणही चांगली झाली होती..Akola Rain Deficit: अकोला जिल्ह्यात १७ टक्के पावसाची तूट.त्यानंतर मात्र तालुक्यात प्रामुख्याने भुरभुर आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. पेरणीला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असतानाही समाधानकारक मोठा पाऊस झालेला नाही. सध्या सोयाबीन, मूग, उडीद यांसह अन्य खरीप पिके फुलोरा आणि शेंगा धारण करण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या काळात पिकांना पुरेशा पाण्याची आवश्यकता आहे. पावसाचा खंड आणि सातत्याने ढगाळ वातावरण राहिल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. सोयाबीनवर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, अळ्यांकडून शेंगांमधील दाणे फस्त केले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी वारंवार फवारण्या करत आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..Rain Deficit: पावसाअभावी अमरावतीतील सहा लाख हेक्टरवरील खरीप संकटात.अंजनडोह परिसरात पंचनाम्याची मागणीअंजनडोह परिसरात खरीप पिकांवर किडी आणि लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहे..माझ्या अडीच एकरांतील सोयाबीनवर अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. प्रत्येक झाडावर चार ते पाच अळ्या असून, त्यांनी शेंगा पूर्णतः फस्त केल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून मदत करावी.- सुनील सोळंके, शेतकरी, अंजनडोह.मोठा पाऊस झालेला नसून, पावसाचा दीर्घ खंड पडला आहे. सातत्याने ढगाळ वातावरण असल्यामुळे खरीप पिकांवर अळी आणि किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे.- जनार्दन भगत, तालुका कृषी अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.