Department Of Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Services Recruitment : ‘कृषी सेवा’ भरतीसाठी आज प्रस्ताव

Agriculture Department : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा २०२१ भरती प्रक्रियेतील आणि कृषी सेवा २०२२ मधील ४१७ उमेदवारांना उच्च आदेशानंतरही नियुक्ती देण्यास विलंब लावल्याचा आरोप करत हे उमेदवार आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाला बसले आहेत.

Team Agrowon

Mumbai News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा २०२१ भरती प्रक्रियेतील आणि कृषी सेवा २०२२ मधील ४१७ उमेदवारांना उच्च आदेशानंतरही नियुक्ती देण्यास विलंब लावल्याचा आरोप करत हे उमेदवार आझाद मैदान येथे धरणे आंदोलनाला बसले आहेत. गेल्या वर्षभरापासून हे उमेदवार नियुक्तीसाठी धडपडत असून नागरी सेवा मंडळाच्या बैठकीनंतर आज (ता. ८) शासन मान्यतेसाठी नियुक्तीचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत (ता. १०) नियुक्तीचे आदेश मिळतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘कृषी सेवा परीक्षा २०२१ व २०२२’ मधून कृषी उपसंचालक गट अ, तालुका कृषी अधिकारी गट-ब व मंडळ कृषी अधिकारी गट-ब (कनिष्ठ) या अधिकारी पदांवरील ४१७ उमेदवारांची ‘एमपीएससी’ने शिफारस करूनही त्यांना नियुक्ती देण्यात आली होती. बीएस्सी ॲग्री आणि बीटेक ॲग्री आणि अन्य शाखांच्या अभ्यासक्रमांतील विसंगतीतून ही परीक्षा न्यायप्रविष्ट झाली होती.

महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ संवर्गातील १२१ सरळसेवा उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात १ मार्च, २०२४ रोजी आदेश काढले होते. मात्र, या नियुक्ती आदेशाला उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. त्यामुळे दोन दिवसांत हे आदेश रद्द करण्यात आले होते. या याचिकांवर उच्च न्यायालयाने निर्णय देत त्या रद्द करत संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश गुरुवारी दिले होते. शुक्रवारी या निर्णयाचे आदेश राज्य सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यानंतर सर्व विभागांतील रिक्त जागांची पडताळणी सुरू केली असून सरळसेवेने नियुक्ती देण्याबाबत नव्याने नागरी सेवा मंडळांची बैठक घेऊन मंगळवारी (ता. ८) शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर विभागनिहाय प्राधान्यक्रमानुसार नियुक्त्या दिल्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर नियुक्त्यांचे आदेश दिले जातील असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

दरम्यान, कृषी सेवा भरती परीक्षेतील उमेदवारांच्या नियुक्त्या तातडीने करण्याचे निर्देश देण्यात येऊनही कृषी विभाग दिरंगाई करत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे तातडीने नियुक्ती देण्यासंदर्भात आझाद मैदान येथे नियुक्ती मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नागरी सेवा मंडळाच्या बैठकीबाबत संभ्रम

धरणे आंदोलनास बसलेल्या उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, ‘नागरी सेवा मंडळाची बैठक शुक्रवारपासून घेऊ, असे आश्वासन आम्हाला दिले जात आहे. मात्र, तसे होत नाही. तसेच नियुक्तीसंदर्भात पाठविलेल्या पत्रांमध्येही सोमवारी नागरी सेवा मंडळाची बैठक झाली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव येणार की नाही याबाबतही आम्हाला माहीत नाही. आम्ही गेल्या वर्षभरापासून नोकरीसाठी झगडत आहोत. अनेकांची हालाकीची परिस्थिती आहे. अनेकांकडे जेवणाचे पैसेही नाहीत. काहींचे लग्न ठरले आहे, पण नियुक्ती नाही म्हणून ती झालेली नाहीत. कृषी मंत्र्यांनी निकाल लागला त्या दिवशीच सोशल मीडियावर विभागाला निर्देश दिल्याचे सांगितले. मात्र, पुढे काहीच झालेले नाही, असा आरोप या उमेदवारांचा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT