Raigad News : जगण्याचा हक्क केवळ माणसांनाच नव्हे तर पशु-पक्षी, जीवजंतूंनाही आहे, याचा विसर मानवाला पडल्याने वन्यजीव धोक्यात आले आहेत. निसर्गाचा समतोल हा वन्यजीवांसाठीही महत्त्वाचा आहे.
३ मार्च जागतिक वन्यजीवदिन म्हणून साजरा होत असताना कोकण किनारपट्टीवरील तरुण, सामाजिक संस्था, प्राणिमित्र यांचे वन्यजीव संवर्धनासाठीचे प्रयत्नही आशादायी आहेत.
हवामान बदल, मानवी हस्तक्षेपामुळे वनक्षेत्रात घट होऊन वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याचे संकेत असल्याने २० डिसेंबर २०१३ ला संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात ३ मार्च वन्यजीवदिन घोषित करण्यात आला.
साडेचार हजार वन्यजीव धोक्यात
सध्या भारतामध्ये १७२ प्रजाती संकटग्रस्त आहेत, तर तब्बल ३० हजार प्रजाती संकटग्रस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सुमारे साडेचार हजार वन्यजीव धोक्याच्या पातळीवर येऊन उभे राहिले आहेत. ही सर्व परिस्थिती अत्यंत गंभीर असून निसर्गाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणारी आहे. यामुळेच या वन्यजीवांचे रक्षण करण्याची जबाबदारी व कर्तव्य याची जाण प्रत्येकाला होणे महत्त्वाचे ठरू लागले आहे.
वन्यजीवांच्या प्रजाती संकटग्रस्त
वन्यजीवांच्या अधिवासामध्ये मानवी वावर वाढू लागल्याने वन्यजीवांचा अधिवास अडचणीत आला आहे. जंगलतोड, वन्यजीवांची शिकार, तस्करी, महामार्ग, धरणे व इतर मोठे प्रकल्प यामुळे होत असलेला जंगलाचा ऱ्हास, प्लॅस्टिक कचरा, रासायनिक प्रदूषण याचा मोठा परिणाम वन्यजीवांवर होत आहे. यातच अनेक वन्यजीवांची कातडी, दात, शिंगे, नखे अशा अवयवांसाठी वन्यजीवांची हत्या व तस्करी होत आहे. यामुळे अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.