Kolhapur River Pollution agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Pollution Kolhapur : नदी पात्रातील पाणी दुर्गंधीयुक्त होऊन नदी पात्रावर अवलंबून ग्रामीण पाणी पुरवठा योजना संकटात येण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Pollution Pancha ganga River : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीपात्रात अनेक गावांतील बंधाऱ्यांवर जलपर्णीचा मोठा विळखा बसत आहे. पुलाची शिरोली, रुई, इचलकरंजीसह अनेक बंधाऱ्यांवर जलपर्णीने पात्र भरले आहे. यामुळे अन्य जलजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच पाणी प्रदूषणाचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे.

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी पंचगंगा नदीवर असणारा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल उतरवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता नवीन पूल उभा राहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नदी पात्रात भराव आहे. शिवाय याच ठिकाणी नदीपात्र थोडे उथळ आहे. परिणामी जलपर्णी तेथे अडकून राहिली आहे.

कोल्हापूर शहरातील जयंती नाल्यासह अनेक छोटे मोठे सांडपाण्याचे नाले थेट पंचगंगा नदी पात्रात मिसळत आहे. यामुळे जलपर्णीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणजे पंचगंगेचे पात्रच जलपर्णीने आच्छादले आहे. लवकरच यावर उपाय शोधणे आवश्यक आहे.

अन्यथा अन्य जलजीवांना आवश्यक सुर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. आणि नदी पात्रातील पाणी दुर्गंधीयुक्त होऊन नदी पात्रावर अवलंबून ग्रामीण पाणी पुरवठा योजना संकटात येण्याची शक्यता आहे.

पंचगंगा प्रदुषण थांबणार कधी

कोल्हापूर जिल्ह्याला पाणी देणाऱ्या पंचगंगा नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. जिल्ह्यातील लाखो लोक या नदीचे पाणी पितात परंतु यावर कोणताही मार्ग निघत नाही. मागच्या कित्येक वर्षांपासून नदी पात्रात गढूळ पाणी सोडलं जात आहे परंतु प्रदुषण नियंत्रण मंडळाने यावर कोणतीही कारवाई केल्याचे दिसत नाही. अनेक वेळा या दुषीत पाण्यामुळे गंभीर आजाराला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

इचलकरंजी वासियांना पाण्यासाठी शुद्ध पाणीच नाही

इचलकरंजी महानगरपालिकेला मागच्या कित्येक वर्षांपासून पंचगंगा नदी पात्रातून दुषीत पाणी पिण्याची वेळ आली आहे. आठवड्यातून दोन वेळा पाणी इचलकरंजी वासियांना मिळते परंतु ते पाणीही दुषीत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून इचलकरंजीला पाण्यासाठी लढा उभारला जात आहे परंतु अद्यापही पाण्यासाठी त्यांची वणवण सुरूच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT